शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

एक डोळा पद्धतीतून एकरी ७१ टनाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 12:40 IST

ढवळगाव येथील सोन्याबापू ढवळे यांनी ऊस लागवडीच्या तंत्रात बदल केला. उसाचा डोळा काढून एक एकर उसाची लागवड करीत सुमारे एकाहत्तर टनाचे उत्पादन घेतले. त्यामुळे शेतीत वाढणाऱ्या उसाचा कालावधी दोन महिन्यानी कमी झाला आहे. त्यामुळे माळरानावर एक डोळा पध्दतीने ऊस लागवड किफायतशीर ठरली आहे.

श्रीगोंदा : ढवळगाव येथील सोन्याबापू ढवळे यांनी ऊस लागवडीच्या तंत्रात बदल केला. उसाचा डोळा काढून एक एकर उसाची लागवड करीत सुमारे एकाहत्तर टनाचे उत्पादन घेतले. त्यामुळे शेतीत वाढणाऱ्या उसाचा कालावधी दोन महिन्यानी कमी झाला आहे. त्यामुळे माळरानावर एक डोळा पध्दतीने ऊस लागवड किफायतशीर ठरली आहे.शिरूर-बेलवंडी रोडवर ढवळगाव येथील शेतकरी माळरानावर कांदा, भाजीपाला, गहू, ज्वारी अशी प्रामुख्याने पिके घेतात. ज्या शेतकºयाकडे थोडे फार पाणी आहे, असेच काही ठराविक शेतकरी उसाचे पीक घेतात. त्यामुळे शेतकºयांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. परंतु अलिकडील काळात येथील शेतकरी शेतीत बदल करून नवनवीन प्रयोग करू लागले. गावातील धोंडिबा संतू ढवळे हे पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते. त्यांचा मुलगा सोन्याबापू ढवळे यांनी शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन एक डोळा पध्दतीने उसाची पध्दत यशस्वी केली आहे.कृषीतज्ज्ञ प्रदीप निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शेतातील एक एकरात उसाचा डोळा पद्धतीने लागवड केली. त्यावेळी त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या होत्या. डोळा काढणी यंत्र, लागवड तंत्रज्ञानाविषयी फारसे माहिती नव्हते. त्यावेळी आयटीसीचे कृषी विस्तार अधिकारी संजय शिंदे यांचे सहकार्य मिळाले. उसाबरोबर आंतरपिकांचा त्यांनी विचार केला. उसामध्ये कांद्याचे आंतरपीक घेतले होते. कांद्याचे चार टनाचे उत्पादन मिळाले असून त्यांची साठवणूक करून नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये दोन हजार रुपये क्विंटलने विक्री केली. त्यातून सुमारे ८० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.अनुभवाचे बोलपारंपरिक पद्धतीने लागवड करताना दोन ते तीन टन ऊस एकरी लागतो. परंतु डोळा पद्धतीने लागवड केल्यामुळे अवघे ५५ ते ६० किलो डोळ्यांचे बियाणे पुरेसे होते. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना उसाचे एकरी ४० टन उत्पन्न मिळत होते. आता सत्तर टनापर्यत उत्पन्न मिळाले. त्यासाठी कृषीतज्ज्ञ प्रदीप निकम यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले. त्यातच आयटीसी व अफार्म यांच्यामुळे त्यांना एक नवीन दिशा मिळाली, असे शेतकरी सोन्याबापू ढवळे यांनी सांगितले.- सोन्याबापू ढवळे, शेतकरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा