शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

प्रतिबंधक कारवाईचा धडाका

By admin | Updated: October 6, 2014 23:55 IST

सुदाम देशमुख, अहमदनगर विधानसभेच्या निवडणुका शांतता व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

सुदाम देशमुख, अहमदनगरविधानसभेच्या निवडणुका शांतता व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चौदाशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर चौदाशे जणांना वॉरंट बजावण्यात आले आहे. राजकीय नेत्यांच्या सभा आणि उमेद्वारांच्या प्रचारासाठी चौख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.जिल्ह्यात झालेली लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली. पाथर्डी तालुक्यातील किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात निवडणूक शांततेत पार पडली. कायदा व सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न निर्माण झाला नव्हता. लोकसभेआधी झालेली नगर महापालिका निवडणूकही शांततेत पार पडली. विधानसभा निवडणूकही शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी,यासाठी पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सुनीता ठाकरे-साळुंके यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यामध्ये १२ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून १३८ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच ठिकाणी पंचरंगी लढती आहेत. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे पोलीस दलाचीही कसोटी लागणार आहे. जिल्ह्यात सध्या कार्यरत नव्याने आलेले वरिष्ठ अधिकारी, तसेच निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पोलिसांना मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी पोलीस दलाने आचारसंहिता लागल्यानंतर उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. आचारसंहिता लागण्याआधीही पोलिसांनी कारवाई करून गुन्हेगारांचा छडा लावला आहे. जिल्ह्यात तब्बल साडेचार हजार जणांकडे शस्त्र परवाने आहेत. आतापर्यंत निम्मेच म्हणजे दोन हजार शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर १४ गावठी कट्टे, ६७ जीवंत काडतुसे, दोन तलवारी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत, तसेच निवडणुकीमध्ये शांतता भंग करण्याची शक्यता आहे, अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.तब्बल १ हजार ४०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी फरार आरोपींचा शोधही जारी ठेवला आहे. दारुबंदी, जुगार, आचारसंहिता भंगाची कारवाईही वेगाने सुरू झाली आहे. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होवू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने ११७ गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव संबंधित प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविले होते. त्यातील ४३ जणांना आतापर्यंत तडीपार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत अद्यापही काही जणांवरील कारवाई प्रक्रियेत आहे.