शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

औषधी जांभळाचे जतन करावे : भाऊसाहेब ब-हाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 18:26 IST

पारंपरिक पिके ही नष्ट होत चालली आहेत. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. पारंपरिक पिके ही मानवाच्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. परंतु ते आता नामशेष होत चालली आहेत. समाजामध्ये वाढणारे मधुमेहाचे प्रमाण व त्यावर जांभूळ हे एक उत्तम औषध म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे जांभुळाचे जतन करण्याची गरज आहे, असे मत आत्माचे संचालक भाऊसाहेब ब-हाटे यांनी मांडले.

अहमदनगर : पारंपरिक पिके ही नष्ट होत चालली आहेत. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. पारंपरिक पिके ही मानवाच्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. परंतु ते आता नामशेष होत चालली आहेत. समाजामध्ये वाढणारे मधुमेहाचे प्रमाण व त्यावर जांभूळ हे एक उत्तम औषध म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे जांभुळाचे जतन करण्याची गरज आहे, असे मत आत्माचे संचालक भाऊसाहेब ब-हाटे यांनी मांडले.बाळापूर इंदरी (आश्वी) येथे शैलजा नावंदर यांनी सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या जांभूळ पिकाच्या बागेस आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब ब-हाटे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. नावंदर यांनी ५०० जांभूळ झाडांची लागवड करून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने त्याचे जतन केले.यावेळी शैलजा नावंदर म्हणाल्या, १९८० पासून शेती व्यवसायास सुरुवात केली. हा व्यवसाय करताना उत्पादन खर्च कमी करणे व जमिनीचा सुपिकता टिकविणे हे मोठे आव्हान पुढे होते. आज शेती उत्पादन घेण्यासाठी खूप रासायनिक खते, भरपूर कीटकनाशके व संप्रेरके यांचा वापर केला जातो. त्यामुळे एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च वाढतो, तर दुसरीकडे उत्पादनाचा दर्जा घसरतो आहे. दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज आमच्याकडे ५०० झाडांची इको फ्रेंडली बाग तयार झाली असून, जांभूळ पिकाचे व्यवस्थापन पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करतो. झाडांचा पडलेला पालापाचोळा त्याच झाडाखाली गाडला जातो. किटकनाशकांपासून संरक्षण करण्यासाठी निंबोळी तेल, करंज तेल, दशपर्णी अर्क या सेंद्रिय निविष्टांचा वापर केला जातो. चिकट सापळे, कामगंध सापळे, प्रकाश सापळे याचा वापर केला जातो. त्यामुळे सेंद्रिय शेतीच्या दजेर्दार फळांचे व विषमुक्त फळांचे उत्पादन आम्ही घेतो. या कामाची पावती म्हणून एफएओ यांच्या वतीने देण्यात येणारा मॉडेलिंग फॉर्मर आॅफ इंडिया हा पुरस्कार बँकॉक येथे भारताला ९ वर्षांनंतर आमच्या रूपाने मिळाला, असे सांगितले.यावेळी कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, सुनील बोरुडे, पोपटलाल नावंदर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर