शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 20:23 IST

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ९ लाख २९ हजार ७१४.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून ७ लाख ७१ हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.खाजगी कारखान्यांनी ५ लाख १२ हजार ५१८ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. १९ कारखान्यांमधून २१ नोव्हेंबरअखेर एकूण १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे.

अहमदनगर : १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.हंगामाच्या प्रारंभीच ऊस दराचे आंदोलन पेटले असले तरी कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत सुरू झाला आहे. आजारातून सावरलेल्या राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला असला तरी परवाना न मिळाल्याने या कारखान्याचे गाळप सुरू झालेले नाही. त्यांचा ५ डिसेंबरला गाळप सुरू होणार आहे. एफ. आर.पी. थकबाकीमुळे साईकृपा-२ सुरू झालेला नाही. कोपरगावच्या संजीवनी कारखान्याने ७५ हजार ८८१.२२ मे. टन उसाचे गाळप करून ६० हजार ५२५क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. काळे कारखान्याने ७५ हजार ५६९.०४ मे.टन गाळपातून ६२ हजार२०० क्विं., गणेश कारखान्याने २७ हजार ५० मे.टन गाळप करून १९ हजार ४७५ क्विं., अशोक ५५ हजार ७३० मे.टन गाळपातून ४२ हजार ८५० क्विं., विखे ६२ हजार ७०० मे.टन गाळपातून ५२ हजार ९०० क्विं., श्रीगोंदा कारखान्याने ९० हजार ५५५.७३ मे.टन गाळपातून ८२ हजार ७५० क्विं., थोरात कारखान्याने १ लाख ३९ हजार १४० मे.टन गाळपातून १ लाख २१ हजार ४७० क्विं., ज्ञानेश्वर कारखान्याने ९५ हजार ३० मे.टन ७३ हजार ८०० क्विं., वृद्धेश्वर कारखान्याने ५१ हजार ४१५ मे.टन ३९ हजार ३५० क्विं., मुळा कारखान्याने ९५ हजार ३२० मे.टनातून ७८ हजार ६५० क्विं., अगस्ती कारखान्याने ६९ हजार ५२३.८८ मे. टनातून ५६ हजार ८४० क्विं., कुकडी ९१ हजार ८०० मे.टनातून ८० हजार ६५० क्विं., क्रांती शुगर (पारनेर)३० हजार ७१५ मे.टनातून २५ हजार ९०० क्विं., पीयूष शुगर(नगर) २५ हजार ३२० मे.टन १३ हजार ५०० क्विं., अंबालिका कारखान्याने २ लाख १३ हजार २८५मे.टनातून १ लाख ९९ हजार ५५० क्विं., गंगामाई (शेवगाव) १ लाख १५ हजार ६०५ मे.टनातून ८६ हजार २८० क्विं., साईकृपा-१ने ३८ हजार ८९५ मे.टनातून ३८ हजार ५०० क्विं., प्रसाद शुगर ५४ हजार ९६० मे.टनातून ४३ हजार ४०० क्विंटल, जय श्रीराम शुगरने ३३ हजार ७३८ मे.टनातून २४ हजार ७१० क्विंटल़अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ९ लाख २९ हजार ७१४.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून ७ लाख ७१ हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.खाजगी कारखान्यांनी ५ लाख १२ हजार ५१८ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सहकारी व खाजगी अशा जिल्ह्यातील दोन्ही प्रकारच्या १९ कारखान्यांमधून २१ नोव्हेंबरअखेर एकूण १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने