शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 20:23 IST

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ९ लाख २९ हजार ७१४.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून ७ लाख ७१ हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.खाजगी कारखान्यांनी ५ लाख १२ हजार ५१८ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. १९ कारखान्यांमधून २१ नोव्हेंबरअखेर एकूण १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे.

अहमदनगर : १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.हंगामाच्या प्रारंभीच ऊस दराचे आंदोलन पेटले असले तरी कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत सुरू झाला आहे. आजारातून सावरलेल्या राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला असला तरी परवाना न मिळाल्याने या कारखान्याचे गाळप सुरू झालेले नाही. त्यांचा ५ डिसेंबरला गाळप सुरू होणार आहे. एफ. आर.पी. थकबाकीमुळे साईकृपा-२ सुरू झालेला नाही. कोपरगावच्या संजीवनी कारखान्याने ७५ हजार ८८१.२२ मे. टन उसाचे गाळप करून ६० हजार ५२५क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. काळे कारखान्याने ७५ हजार ५६९.०४ मे.टन गाळपातून ६२ हजार२०० क्विं., गणेश कारखान्याने २७ हजार ५० मे.टन गाळप करून १९ हजार ४७५ क्विं., अशोक ५५ हजार ७३० मे.टन गाळपातून ४२ हजार ८५० क्विं., विखे ६२ हजार ७०० मे.टन गाळपातून ५२ हजार ९०० क्विं., श्रीगोंदा कारखान्याने ९० हजार ५५५.७३ मे.टन गाळपातून ८२ हजार ७५० क्विं., थोरात कारखान्याने १ लाख ३९ हजार १४० मे.टन गाळपातून १ लाख २१ हजार ४७० क्विं., ज्ञानेश्वर कारखान्याने ९५ हजार ३० मे.टन ७३ हजार ८०० क्विं., वृद्धेश्वर कारखान्याने ५१ हजार ४१५ मे.टन ३९ हजार ३५० क्विं., मुळा कारखान्याने ९५ हजार ३२० मे.टनातून ७८ हजार ६५० क्विं., अगस्ती कारखान्याने ६९ हजार ५२३.८८ मे. टनातून ५६ हजार ८४० क्विं., कुकडी ९१ हजार ८०० मे.टनातून ८० हजार ६५० क्विं., क्रांती शुगर (पारनेर)३० हजार ७१५ मे.टनातून २५ हजार ९०० क्विं., पीयूष शुगर(नगर) २५ हजार ३२० मे.टन १३ हजार ५०० क्विं., अंबालिका कारखान्याने २ लाख १३ हजार २८५मे.टनातून १ लाख ९९ हजार ५५० क्विं., गंगामाई (शेवगाव) १ लाख १५ हजार ६०५ मे.टनातून ८६ हजार २८० क्विं., साईकृपा-१ने ३८ हजार ८९५ मे.टनातून ३८ हजार ५०० क्विं., प्रसाद शुगर ५४ हजार ९६० मे.टनातून ४३ हजार ४०० क्विंटल, जय श्रीराम शुगरने ३३ हजार ७३८ मे.टनातून २४ हजार ७१० क्विंटल़अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ९ लाख २९ हजार ७१४.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून ७ लाख ७१ हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.खाजगी कारखान्यांनी ५ लाख १२ हजार ५१८ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सहकारी व खाजगी अशा जिल्ह्यातील दोन्ही प्रकारच्या १९ कारखान्यांमधून २१ नोव्हेंबरअखेर एकूण १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने