शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

खंडित वीजपुरवठा चार दिवसांत सुरळीत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST

तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा गेल्या चार ते पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. कारखान्याकडे महाराष्ट्र राज्य ...

तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा गेल्या चार ते पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. कारखान्याकडे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची १ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकी भरणे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लॉकडाऊनच्या काळात कारखान्याने थकबाकीची रक्कम भरली नव्हती. त्यामुळे महावितरणने कारखान्याचे कनेक्शन कट करण्याचा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला. कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत विद्युतपुरवठा सुरळीत होणार आहे.

...............

तनपुरे कारखान्याचा वीजपुरवठा चार ते पाच दिवसांपासून खंडित केला आहे. कारखान्याची थकबाकी जवळपास दोन अडीच वर्षांपासून एक कोटीच्या घरात आहे. मुंबई हेड ऑफिसने मुदत देऊनदेखील कारखान्याने हप्ते भरलेले नाही. मागील हप्ते भरल्यावर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.

- प्रदीप देहरकर, उपकार्यकारी अभियंता, देवळाली प्रवरा, राहुरी

...................

तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होणार आहे. कारखान्याची जी वीजबिलाची थकबाकी आहे त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. ४ ते ५ दिवसांनंतर वीजपुरवठा सुरळीत होणार आहे.

- नामदेवराव ढोकणे, चेअरमन, तनपुरे सहकारी साखर कारखाना, राहुरी