शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

वीजप्रश्नी कोकणगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:23 IST

वीजबिलाच्या कारणाने आश्वी, कनोली, मनोली कोल्हेवाडी, रहीमपूर, जोर्वे, निंबाळे आदी गावांमधील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम वीज ...

वीजबिलाच्या कारणाने आश्वी, कनोली, मनोली कोल्हेवाडी, रहीमपूर, जोर्वे, निंबाळे आदी गावांमधील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाचे लाट निर्माण झाली होती. या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते. आमदार विखे यांनीही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितले होते.

मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने, आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कोल्हार-घोटी या मार्गावर कोकणगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले.

महाविकास आघाडी सरकार आणि वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकरी नेते संतोष रोहोम यांनी या राज्यातील एका मंत्र्यावर पोलीस गुन्हा दाखल करत नाही, पण शेतकऱ्यांना कायद्याचा धाक दाखविला जातो. शेतकऱ्यांचे मागील वीजबिल माफ करा, वीज कनेक्शन तोडण्याचा आदेश मागे घ्या. या मागण्या त्यांनी आपल्या भाषणात केल्या.

भाजपच्या किसान आघाडीचे अध्यक्ष सतीश कानवडे, शांताराम शिंदे, दिलीप इंगळे, श्रीराज डेरे, हरिश्चंद्र चकोर, गोकुळ दिघे, सचिन शिंदे, रवींद्र गाढे, शिवाजीराव कोल्हे, मंगेश शिंदे, मोहन वामन, दादासाहेब गुंजाळ, सुनील शिंदे, गंगाराम वर्पे, कैलास वायकर, आण्णासाहेब शिंदे, उत्तम वर्पे, ज्ञानदेव वर्पे, जितेंद्र शिंदे, सतीश वाळुंज, देविदास शिंदे, बाबासाहेब वाकचौरे या आंदोलनात सहभागी झाले होते.

अखेर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आणि अभियंता भांगरे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.