शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

तलावाला निधीचा अडसर

By admin | Updated: July 19, 2014 00:36 IST

जामखेड : भुतवडा जोड तलावाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे २५५ हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे.

जामखेड : भुतवडा जोड तलावाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे २५५ हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे.ठेकेदाराची असमर्थतातलावाचे काम सध्या ९० टक्के पूर्ण झाले आहे. केवळ पिचिंग व भरावाचे किरकोळ काम तसेच जुना व नवा भुतवडा तलावांना जोडणाऱ्या लिंक कालव्याचे तीस मीटर काम बाकी आहे. हे काम जून २०१३ पर्यंत पूर्ण होईल, अशी शासनाला आशा होती. परंतु ठेकेदाराने जुन्या अंदाजपत्रकाच्या दराप्रमाणे काम करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे २५५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकले नाही. तालुक्यातील अमृतलिंग व भुतवडा लिंक तलावांची कामे अपूर्ण असल्याने तलावासाठी पैसे खर्च करुनही सिंचन निर्मिती होऊ शकत नाही. गेल्या पंधरा वर्षापासून या तलावाच्या निर्मितीला साडेसाती लागली आहे. भुतवडा लिंक तलावाचे काम दोन हजार साली दोन कोट रुपये अंदाजपत्रकीय मंजूर होऊन सुरु झाले होते. अठरा महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करावयाचे होते. परंतु विविध कारणांमुळे हे काम सातत्याने रखडले. अंतिम मुदत संपल्याने सन २००७ मध्ये ठेकेदाराने काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी निविदा शर्थ रद्द केली. योजनेच्या उर्वरित कामासाठी सन २००८ मध्ये पुुन्हा निविदा काढून हे काम पुणे येथील कंत्राटदाराला देण्यात आले. त्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आली. सन २००९ मध्ये लघुपाटबंधारे खात्याने तलावाचे काम करणाऱ्या पूर्वीच्या कंत्राटदाराला अंतिम देयक देताना मोजणी अहवाल विचारात न घेता सोळा लाख जादा देण्यात आले. आणि येथूनच कामाला साडेसाती लागली. (तालुुका प्रतिनिधी)निधीची गरज !या जोड तलावाचे काम दहा टक्के अपूर्ण आहे. ठेकेदाराने काम केल्यास जादा मोबदला दिला जाईल. दोन तलावांना जोडणारा लिंक कालवा तीस मीटर लांब व त्यावरील पूल व इतर किरकोळ कामांसाठी सध्याच्या दराप्रमाणे ४५ लाखांच्या निधीची गरज आहे. राम ढेपे, कनिष्ठ अभियंताआश्वासन हवेत विरले२०१३ च्या हिवाळी अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी तलावातील कामाविषयी प्रश्न उपस्थित केला तेव्हा तत्कालीन जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांनी जून २०१३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाची अद्याप पूर्णता झालेली नाही. मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तलावाला भेट देऊन निधीच्या तरतुदीचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासनही हवेत विरले आहे.