शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सफरचंदापेक्षा डाळिंबानेच खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:30 IST

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये सध्या आवक कमी झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे. सफरचंद हे महागडे फळ म्हणून समजले ...

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये सध्या आवक कमी झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे. सफरचंद हे महागडे फळ म्हणून समजले जाते. मात्र सफरदंचापेक्षा डाळिंबाला सर्वात जास्त दर मिळाला आहे. याशिवाय मोसंबी, संत्र्यांचीही आवक झाली असून या फळांचे भाव स्थिर आहेत.

नगर येथील बाजार समितीमध्ये शनिवारी सफरचंदाला ११ हजार व डाळिंबाला १२ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. रविवारीही तोच दर कायम होता. एरवी सफरचंदाचा जास्त दर असतो. मात्र आवक कमी असल्याने डाळिंबाचे दर वाढले आहेत. संत्री आणि मोसंबीचे दर सध्या स्थिर आहेत. द्राक्षेही स्वस्त झाले असून पाच हजार रुपये क्विंटलप्रमाणे दर मिळाले आहेत. केळी आणि कलिंगडाला सर्वात कमी दर आहे.

कांदा, हिरवी मिरची, पालेभाज्यांचेही दर वाढले आहेत. कांद्याला ४४०० रुपये क्विंटल दर मिळाला आहे. मेथी १० ते १५ रुपये, कोथिंबीर १० रुपये जुडी असा दर आहे. हिरवी मिरची कडाडली असून मिरचीला ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. शेवगा- ३५ रुपये, वांगी-२५ रुपये, गवार-८५ रुपये, कारले-४० रुपये किलो असा दर बाजार समितीमध्ये मिळाला आहे.

---

फळांचे ठोक दर (रुपये प्रतिक्विंटल)

मोसंबी- ६०००, संत्रा- ६०००, डाळिंब-१२०००, पपई-१२००, रामफळ-६०००, चिक्कू-२५००, द्राक्षे-५०००, अंजिर-४०००, सफरचंद-११०००, कलिंगड-७००, खरबूज-२२००, पेरू-३०००, केळी-७००

------