शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

सफरचंदापेक्षा डाळिंबानेच खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:30 IST

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये सध्या आवक कमी झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे. सफरचंद हे महागडे फळ म्हणून समजले ...

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये सध्या आवक कमी झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे. सफरचंद हे महागडे फळ म्हणून समजले जाते. मात्र सफरदंचापेक्षा डाळिंबाला सर्वात जास्त दर मिळाला आहे. याशिवाय मोसंबी, संत्र्यांचीही आवक झाली असून या फळांचे भाव स्थिर आहेत.

नगर येथील बाजार समितीमध्ये शनिवारी सफरचंदाला ११ हजार व डाळिंबाला १२ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. रविवारीही तोच दर कायम होता. एरवी सफरचंदाचा जास्त दर असतो. मात्र आवक कमी असल्याने डाळिंबाचे दर वाढले आहेत. संत्री आणि मोसंबीचे दर सध्या स्थिर आहेत. द्राक्षेही स्वस्त झाले असून पाच हजार रुपये क्विंटलप्रमाणे दर मिळाले आहेत. केळी आणि कलिंगडाला सर्वात कमी दर आहे.

कांदा, हिरवी मिरची, पालेभाज्यांचेही दर वाढले आहेत. कांद्याला ४४०० रुपये क्विंटल दर मिळाला आहे. मेथी १० ते १५ रुपये, कोथिंबीर १० रुपये जुडी असा दर आहे. हिरवी मिरची कडाडली असून मिरचीला ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. शेवगा- ३५ रुपये, वांगी-२५ रुपये, गवार-८५ रुपये, कारले-४० रुपये किलो असा दर बाजार समितीमध्ये मिळाला आहे.

---

फळांचे ठोक दर (रुपये प्रतिक्विंटल)

मोसंबी- ६०००, संत्रा- ६०००, डाळिंब-१२०००, पपई-१२००, रामफळ-६०००, चिक्कू-२५००, द्राक्षे-५०००, अंजिर-४०००, सफरचंद-११०००, कलिंगड-७००, खरबूज-२२००, पेरू-३०००, केळी-७००

------