शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

डाळिंबप्रश्नी केंद्राचे लक्ष वेधणार

By admin | Updated: June 26, 2023 16:58 IST

डाळिंब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केल्या.

राहाता : राज्यात डाळिंब उत्पादकांच्या निर्माण झालेल्या समस्यांबाबत आणि निर्यातीच्या प्रश्नासंदर्भात डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांंची भेट घेणार असून राज्यातील बाजार समित्यांनीही डाळिंब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केल्या. राज्यातील डाळिंब उत्पादकांच्या निर्माण झालेल्या प्रश्नांसर्भात विचारविनियम करण्यासाठी बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्यातील डाळिंब उत्पादक, निर्यातदार, व्यापारी आणि कृषी व पणन विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक विखे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत डाळिंब उत्पादक, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीचे उपाय म्हणून धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्यावर सोपविण्यात आली. शेतीमालाचे नुकसान होणार नाही याकरीता बाजार समित्यांनी गरजेप्रमाणे तातडीने शेड उभारावेत आणि रविवार सोडून सर्व बाजार समित्यांच्या सुट्या रद्द करण्यात याव्यात अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाल्यास बाजार समितीलाच जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.घेतलेल्या निर्णयांची कडक अंमलबजावणी होण्यासाठी दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार कृषी आयुक्तांना देण्यात आले. राज्यात उभ्या असलेल्या प्रक्रिया प्रकल्प चालकांशी तातडीने चर्चा करून डाळिंबापासून उपपदार्थ निर्मितीबाबत कसे धोरण आखता येईल. याबाबत बुधवारी पुणे येथे सर्व प्रक्रिया उद्योजकांची बैठक घेण्याचेही विखे यांनी सूचित केले. निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा शासनाकडून पुरविण्याबाबत सकारात्मकता राहिल, असे सांगून निर्यातीसाठी रेफ्रिजरेटर पद्धतीचे कंटेनर पणन मंडळाकडून उपलब्ध व्हावेत, यासाठी कंटेनर कार्पोरेशनशी संपर्क साधून याबाबत अनुदान देण्याबाबतही विचार करू, अशी ग्वाही विखे यांनी डाळिंब उत्पादक व निर्यातदार यांना दिली.कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी डाळिंब उत्पादनाबाबतचा आढावा घेतला. निर्यातदार संजय पानसरे, अभिजीत बसाळे, प्रमोद देशमुख, तानाजी चौधरी यांच्यासह डाळिंब उत्पादकांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीला अण्णासाहेब म्हस्के, दिलीप बनकर, विश्वासराव भोसले, मिलिंद आकरे, भाऊसाहेब कडू आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)