शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

डाळिंबप्रश्नी केंद्राचे लक्ष वेधणार

By admin | Updated: June 26, 2023 16:58 IST

डाळिंब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केल्या.

राहाता : राज्यात डाळिंब उत्पादकांच्या निर्माण झालेल्या समस्यांबाबत आणि निर्यातीच्या प्रश्नासंदर्भात डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांंची भेट घेणार असून राज्यातील बाजार समित्यांनीही डाळिंब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केल्या. राज्यातील डाळिंब उत्पादकांच्या निर्माण झालेल्या प्रश्नांसर्भात विचारविनियम करण्यासाठी बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्यातील डाळिंब उत्पादक, निर्यातदार, व्यापारी आणि कृषी व पणन विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक विखे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत डाळिंब उत्पादक, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीचे उपाय म्हणून धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्यावर सोपविण्यात आली. शेतीमालाचे नुकसान होणार नाही याकरीता बाजार समित्यांनी गरजेप्रमाणे तातडीने शेड उभारावेत आणि रविवार सोडून सर्व बाजार समित्यांच्या सुट्या रद्द करण्यात याव्यात अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाल्यास बाजार समितीलाच जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.घेतलेल्या निर्णयांची कडक अंमलबजावणी होण्यासाठी दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार कृषी आयुक्तांना देण्यात आले. राज्यात उभ्या असलेल्या प्रक्रिया प्रकल्प चालकांशी तातडीने चर्चा करून डाळिंबापासून उपपदार्थ निर्मितीबाबत कसे धोरण आखता येईल. याबाबत बुधवारी पुणे येथे सर्व प्रक्रिया उद्योजकांची बैठक घेण्याचेही विखे यांनी सूचित केले. निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा शासनाकडून पुरविण्याबाबत सकारात्मकता राहिल, असे सांगून निर्यातीसाठी रेफ्रिजरेटर पद्धतीचे कंटेनर पणन मंडळाकडून उपलब्ध व्हावेत, यासाठी कंटेनर कार्पोरेशनशी संपर्क साधून याबाबत अनुदान देण्याबाबतही विचार करू, अशी ग्वाही विखे यांनी डाळिंब उत्पादक व निर्यातदार यांना दिली.कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी डाळिंब उत्पादनाबाबतचा आढावा घेतला. निर्यातदार संजय पानसरे, अभिजीत बसाळे, प्रमोद देशमुख, तानाजी चौधरी यांच्यासह डाळिंब उत्पादकांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीला अण्णासाहेब म्हस्के, दिलीप बनकर, विश्वासराव भोसले, मिलिंद आकरे, भाऊसाहेब कडू आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)