शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

७०५ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीसाठी आज (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतीच्या ५ हजार ७९६ जागांसाठी १३ हजार १९४ ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीसाठी आज (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतीच्या ५ हजार ७९६ जागांसाठी १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात आहेत. आपले गाव कारभारी निवडण्यासाठी १३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॉनिटायझर, थर्मल गनची मतदान केंद्रावर प्रथमच व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी दीड हजार कर्मचारी, तर साडे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ९ ग्रामपंचायतीमधील काही जागा बिनविरोध झाल्याने व काही जागांवर अर्ज प्राप्त न झाल्याने तेथील जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे ७०५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. ७०५ ग्रामपंचायतीसाठी ५ हजार ७९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

--------------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

सर्व मतदान केंद्र सॉनिटाईज करण्यात आली असून मास्क, सॉनिटायझर, थर्मल गनची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी आणि मतदार यांची तपासणी होईल. कोरोनाबाधित असेल आणि त्याला मतदान करण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी शेवटचा अर्धा तास राखीव असेल. लक्षणे नसलेल्यांना नियम पाळून मतदान करता येईल.

----

१८ जानेवारीला मतमोजणी

१८ जानेवारीला सर्व तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येतील. मतदानानंतर चौथ्या दिवशी मतमोजणी होणार आहे.

--------------

निवडणूक निर्णय अधिकारी

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. संबंधित तहसीलदारांनी संबंधित तालुक्यातील मतदान केंद्रावर लक्ष ठेवायचे आहे. कुठेही गडबड-गोंधळ होणार नाही. याची सर्व दक्षता घेण्यात आली आहे.

---

५२ संवेदनशील गावे

जिल्ह्यात ५२ गावे संवेदनशील म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. अशा गावांमध्ये मतदान होण्यापूर्वीच्या दोन दिवस आधी पोलिसांचे पथसंचलन पार पडले आहे. तसेच या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

- उर्मिला पाटील,

उपजिल्हाधिकारी (महसूल-ग्रामपंचायत)

------------

पोलीस बंदोबस्त

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. तब्बल साडे तीन हजार पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. त्यामध्ये १२५ अधिकारी आहेत, तर दोन हजार पोलीस आणि तेराशे होमगार्ड आहेत. संवेदनशील गावांमध्ये पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मतदान केंद्रावरही बंदोबस्त असेल.

---

सोबत आकडेवारी आहे.