शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

७०५ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीसाठी आज (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतीच्या ५ हजार ७९६ जागांसाठी १३ हजार १९४ ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीसाठी आज (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतीच्या ५ हजार ७९६ जागांसाठी १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात आहेत. आपले गाव कारभारी निवडण्यासाठी १३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॉनिटायझर, थर्मल गनची मतदान केंद्रावर प्रथमच व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी दीड हजार कर्मचारी, तर साडे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ९ ग्रामपंचायतीमधील काही जागा बिनविरोध झाल्याने व काही जागांवर अर्ज प्राप्त न झाल्याने तेथील जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे ७०५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. ७०५ ग्रामपंचायतीसाठी ५ हजार ७९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

--------------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

सर्व मतदान केंद्र सॉनिटाईज करण्यात आली असून मास्क, सॉनिटायझर, थर्मल गनची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी आणि मतदार यांची तपासणी होईल. कोरोनाबाधित असेल आणि त्याला मतदान करण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी शेवटचा अर्धा तास राखीव असेल. लक्षणे नसलेल्यांना नियम पाळून मतदान करता येईल.

----

१८ जानेवारीला मतमोजणी

१८ जानेवारीला सर्व तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येतील. मतदानानंतर चौथ्या दिवशी मतमोजणी होणार आहे.

--------------

निवडणूक निर्णय अधिकारी

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. संबंधित तहसीलदारांनी संबंधित तालुक्यातील मतदान केंद्रावर लक्ष ठेवायचे आहे. कुठेही गडबड-गोंधळ होणार नाही. याची सर्व दक्षता घेण्यात आली आहे.

---

५२ संवेदनशील गावे

जिल्ह्यात ५२ गावे संवेदनशील म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. अशा गावांमध्ये मतदान होण्यापूर्वीच्या दोन दिवस आधी पोलिसांचे पथसंचलन पार पडले आहे. तसेच या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

- उर्मिला पाटील,

उपजिल्हाधिकारी (महसूल-ग्रामपंचायत)

------------

पोलीस बंदोबस्त

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. तब्बल साडे तीन हजार पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. त्यामध्ये १२५ अधिकारी आहेत, तर दोन हजार पोलीस आणि तेराशे होमगार्ड आहेत. संवेदनशील गावांमध्ये पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मतदान केंद्रावरही बंदोबस्त असेल.

---

सोबत आकडेवारी आहे.