शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

परीक्षा रद्द करण्याबाबत भाजपकडून राजकारण-प्राजक्त तनपुरे, लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 11:45 IST

पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी (दि.१४ जून) सांगितले.

 राहुरी : पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी (दि.१४ जून) सांगितले.

  राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे मते जाणून घेतली आहेत. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नोकºया मिळतात. परीक्षेची टांगती तलवार राहिली  तर कोरोनात आरोग्यास व जीवितास धोका होऊ शकतो. परीक्षा पुढे ढकलली तर नोकरीची संधी जाईल. विद्यार्थी मानसिकता तणावाखाली राहतील. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका झाल्या आहेत, असेही तनपुरे म्हणाले.  

   यूजीसीच्या मार्गदर्शन सूचनांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा जुलैमध्ये घेण्याचे ठरले आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलै महिन्याची परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री उदय सामंत, सर्व विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या समवेत अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांची बाजू सांगितली. त्यावर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करून मागील सर्व सेमिस्टरचा सरासरी गुण द्यावेत. ज्या विद्यार्थ्यांना गुण वाढविण्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी जुलैनंतर परीक्षा घ्यावी. याविषयी सर्वांचे एकमत झाले असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

 विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव नको. एवढाच उद्देश आहे. त्यांच्यामागे कुठलेही राजकारण नाही, असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीEducationशिक्षणPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे