शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

भिडे यांच्या रुपाने द्वेषाचे राजकारण, प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 04:44 IST

संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

तिसगाव (जि. अहमदनगर) - संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे रविवारी राज्यस्तरीय भटक्या विमुक्तांच्या चिंतन परिषदेच्या समारोप झाला. आंबेडकर अध्यक्षस्थानी होते. विधिज्ञ विजय मोरे व मानवेंद्र वैदू, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, स्मिता पानसरे आदी उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, पक्षांतर्गत हुकुमशाही घातक असल्याचे सांगत आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही अप्रत्यक्ष हल्ला केला. सध्याच्या समाजव्यवस्थेत एकमेकांबद्दल गैरसमज व संशयाचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. त्याचा मुकाबलाही आता एकत्रितपणे करावा लागेल. सध्या प्रस्थापित भाजपाचा एक मार्ग, तर बाबासाहेबांच्या विचारांचा दुसरा मार्ग समोर आहे. चौरस्त्यावर थांबण्याचा व थांबणाऱ्यांचा काळ आता संपला आहे. राजेशाहीत भटक्या विमुक्तांना स्थान नव्हते. लोकशाहीत ते स्थान बाबासाहेबांचे विचार व संविधानाने दिले. त्याअनुरूप न्याय व हक्क मिळण्यासाठी राज्याच्या व्यवस्थेचा भाग बनणे हाच चळवळीचा एकमेव अजेंडा आता असला पाहिजे. सत्तेचा हिस्सा होण्यासाठी २८८ जागा मिळविण्यासाठी आता प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.प्रत्येक वर्षी मढी यात्रेनंतर राज्यातील भटक्या विमुक्तांची परिषद मढी येथील कानिफनाथांच्या भूमीत घेतली जाईल, असे संयोजक प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी