शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

रेशनिंगच्या धान्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रक पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

राजूर येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास गाडे ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या (एमएच- ०४, ईवाय- ५२९१) वाहनामध्ये ५० किलो वजनाच्या २१८ बॅग ...

राजूर येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास गाडे ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या (एमएच- ०४, ईवाय- ५२९१) वाहनामध्ये ५० किलो वजनाच्या २१८ बॅग धान्य, एमएच-१५, एफव्ही-९०५७ मध्ये १४९ बॅग, एमएच-१७, एजी-३८८३ मध्ये २०६ बॅग आणि एमएच-१७, टी-२९०० मध्ये २०३ बॅग धान्य, असे धान्य ट्रकमधून नेले जात होते. राजूर येथे नाकाबंदी सुरू असल्याने राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांनी या वाहनांची चौकशी केली.

त्यामध्ये रेशनिंगचा माल आढळून आला. माल अधिकृत असला तरी पोहोच करणारी वाहने अधिकृत परवानाधारक नसल्याचे पोलिसांना आढळून आले. धान्य ताब्यात दिलेल्या पावत्यांवर संबंधित गोडाऊन कीपरच्या सह्या नव्हत्या. त्यामुळे ही चारही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली. याबाबत साबळे यांनी तहसीलदारांना माहिती दिली. यानंतर पुरवठा निरीक्षक राकेश रावते हे राजूर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी चौकशी केली. हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या वाहनांवर पुढील सूचनांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.

..............

चौकशी होऊन गरिबाच्या ताटातील अन्न इतरत्र जात असेल, तर चौकशी होणे आवश्यक आहे. जिल्हा पुरवठा विभागाने या अनागोंदी कारभारास आळा घालावा. आदिवासी भागात खाण्यासाठी अन्न मिळत नाही. खावटी नाही. रोजगार नाही. त्यात जर असे धान्य कोणतेही सरकारी निर्बंध न पाळता नेले जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही. कोणतेही राजकीय दडपण झुगारून न्यायनिवडा करावा.

-वैभव पिचड, माजी आमदार