शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अडीच हजार सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या टू-प्लस योजनेंतर्गत पोलिसांनी २ हजार ६४० गुन्हेगारांची ...

अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या टू-प्लस योजनेंतर्गत पोलिसांनी २ हजार ६४० गुन्हेगारांची यादी अद्ययावत केली आहे. या गुन्हेगारांचे पोलीस ठाणेनिहाय मेळावे घेऊन ‘आता पुन्हा गुन्हा केला तर कठोर कारवाई केली जाईल’, अशी तंबी दिली जात आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांना आता चांगलाच वचक बसणार आहे.

टू-प्लस योजनेंतर्गत शनिवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आयोजित मेळाव्यात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः गुन्हेगारांची माहिती घेत त्यांना समज दिली. यावेळी दोन व त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेल्या चाळीसजणांना बोलावण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख उपस्थित होते. जिल्ह्यात आतापर्यंत अशा स्वरूपाचे सहा मेळावे घेण्यात आले आहेत. टू-प्लस योजनेंतर्गत मालमत्तेसंदर्भात गुन्हे करणारे ९७५ तर शरिराविरोधात गुन्हे करणाऱ्या १ हजार ६६५ जणांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या गुन्हेगारांवर आता कायमस्वरूपी पोलिसांची नजर राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांचाही अशाच स्वरूपाचा मेळावा घेण्यात आला.

...........

२०० टोळ्यांचा समावेश

टू-प्लस योजनेंतर्गत अन्य सराईत गुन्हेगारांसह संघटित गुन्हे करणाऱ्या दोनशे टोळ्यांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. या सर्व माहितीसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर सराईत गुन्हेगारांची माहिती पोलिसांना मिळणार आहे.

.........

राज्यातील पथदर्शी उपक्रम

पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे सोलापूर येथे कार्यरत असताना, त्यांनी तेथेही टू-प्लस योजना यशस्वीरित्या राबवली होती. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ही योजना अतिशय उपयुक्त असल्याने राज्यातील इतर जिल्ह्यांतही ही योजना आगामी काळात राबवली जाणार असल्याचे समजते.

........

गुन्हेगारीत नगर प्रथम स्थानी

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्थानिक व बाहेरील गुन्हेगारांचा या गुन्हेगारी कृत्यात सहभाग आहे. आगामी काळात मात्र सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

...........

दोन अथवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती टू-प्लस योजनेंतर्गत संकलित करण्यात आली आहे. या गुन्हेगारांना एकत्रित बोलावून त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव करून दिली जात आहे. यातून पोलिसांची कायमस्वरूपी नजर या गुन्हेगारांवर राहणार आहे तसेच एखाद्या गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा केला तर त्याच्यावर तत्काळ पुढील कारवाई करणे शक्य होणार आहे.

- मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर

ओळी - भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात टू-प्लस योजनेंतर्गत गुन्हेगारांची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

फोटो- २० भिंगार पोलीस