शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

अहमदनगर शहरातील कचरा डेपोला पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 20:44 IST

सोमवारपासून तीन दिवस सलग शहरातील जागेवरच ठप्प झालेला कचरा अखेर बुधवारी रात्रीपासून उचलण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. रस्त्यात थांबलेली वाहने बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांच्या बंदोबस्तात सावेडी डेपोत नेण्यात आली.

ठळक मुद्देतीन दिवसानंतर सावेडी डेपोतच कचरा ओतण्यास सुरवात पोलिसांनी बजावल्या नोटिसा

अहमदनगर : सोमवारपासून तीन दिवस सलग शहरातील जागेवरच ठप्प झालेला कचरा अखेर बुधवारी रात्रीपासून उचलण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. रस्त्यात थांबलेली वाहने बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांच्या बंदोबस्तात सावेडी डेपोत नेण्यात आली. वाहनांमधील कचरा ओतण्याचे काम सुरू झाले असून डेपोवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने डेपोभोवती सुरू ठेवलेल्या आंदोलनाची तलवार म्यान केली असून आता लोकशाहीपद्धतीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.सावेडी येथील आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या पाठीमागे असलेला कचरा डेपो हलविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर आणि स्थानिक नागरिकांनी सोमवारपासून सावेडी कचरा डेपोत जाणारी कचºयाची वाहने अडविली होती. हे आंदोलन दोन दिवस सुरूच होते. त्यामुळे शहरातील सर्व कचरा जागेवरच होता. सावेडी येथील कचरा डेपो कोणत्याही परिस्थितीत हलविला जाणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांनी घेतली. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम यांनी थेट जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन देत कचरा वाहने खाली करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. त्यानंतर अधिक्षकांनी बंदोबस्त तैनात केला. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत तोफखाना पोलिसांनी बुधवारी कचरा डेपोची पाहणी केली होती. मात्र तेथे सर्वकाही सुव्यवस्थित असल्याने विनाकारण नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी संपत बारस्कर यांच्यासह चार आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर बुधवारी रात्रीच पोलीस बंदोबस्तात वाहने डेपोत खाली करण्याचे काम सुरू झाले.

  • पोलिसांनी बजावल्या नोटीसा
  • शहरातील शांततेत बाधा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी नगरसेवक संपत बारस्कर यांच्यासह चार आंदोलनकर्त्यांना नोटीसा बजावल्या. वाहने डेपोत जाण्यास प्रतिबंध केल्यामुळे शहरातील शांततेस बाधा येवू शकते. कचरा जागेवरच राहिल्याने शहरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होवू शकतो. शहरातील अनेक नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने मागितल्यानुसार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे शांतता भंग होवू नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे कृत्य करू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.
टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका