शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

नगरकरांसाठी खड्डे ठरताहेत डोकेदुखी : मक्याचे आजार अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST

अहमदनगर : मुसळधार पावसानंतर नगरमधील रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. हे खड्डे नगरकरांसाठी डोकुदुखी ठरत आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविताना ...

अहमदनगर : मुसळधार पावसानंतर नगरमधील रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. हे खड्डे नगरकरांसाठी डोकुदुखी ठरत आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविताना होणारे अपघात, वाहतूक कोंडी, अशा समस्यांना नगरकरांना तोंड द्यावे लागत आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने खड्डेमय रस्त्यांशिवाय नगरकरांना दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे मणक्याचे आजार उद्भवत आहेत.

ण्सळधार पावसात नगरमधील रस्त्यांची दुर्दशा होते. शहरातील आयुर्वेद कॉलेज चौक, टिळक रोड रस्ता, वाडियापार्क समोरील रस्ता, जुनी महानगरपालिका, बेग पटांगण समोरील रस्ता, शनी चौक रस्ता, नालेगाव पटवर्धन चौक रस्ता, गुलमोहर रोड, कल्याण रोड, लालटाकी, नालेगाव, चितळे रोड, माणिक चौक, कापडबाजार, नवीपेठ, अमरधाम या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत जोड रस्ते, गल्ल्या, प्रभागातील छोटे मोठे रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. पेव्हर ब्लॉकचे रस्तेही ठिकठिकाणी खचल्याचे आढळून आले आहेत. खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात होऊ लागले आहेत. दुचाकीस्वरांना अक्षरश: जीव मुठीत धरून वाहने चालवावे लागत आहेत. विशेष म्हणजे भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांवरून वाहने घसरून अनेक अपघात झाले. जे रस्ते पाईप टाकण्यासाठी खोदले होते, ते पावसाळ्यापूर्वी म्हणजे मे महिन्यापर्यंत दुरुस्त झाले असते तर आज ही वेळ नगरकरांवर आली नसती. मात्र, त्यावेळी पदाधिकारी व प्रशासनही हातावर हात धरून बसले. लॉकडाऊन संपला. पण, रस्त्यावर टोपलीभर मुरूमही पालिकेकडून टाकला गेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत असून, याकडे सत्ताधाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.

...

पावसाळ्यापूर्वी महापालिका झोपली होती का ?

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन हा स्वतंत्र विभाग महापालिकेत कार्यरत आहेत. पावसाळा सुरू होण्याआधीच नालेसफाई, रस्त्यांची डागडुजी, गटारींची साफसफाई यासारखी कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे. परंतु, या काळात काहीच काम झाले नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर पॅचिंगसाठी निविदा काढली गेली. पाऊस थांबल्यानंतर लगेच काम सुरू होईल, या महापालिकेच्या म्हणण्यावर उन्हाळ्यात झोपले होते का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

....

सत्ताधारी दालने अन् पदग्रहण सोहळ्यात व्यस्त

शहरातील रस्त्यांची दुर्दैशा झाली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता संपुष्टात येऊन महाविकास आघाडी सत्तेवर आली. भाजपाच्या काळात खड्डे बुजविण्याचे नियोजन झाले नाही. हे जरी खरे असले तरी महाविकास आघाडीने सत्तेच्या चाव्या हाती आल्यानंतर खड्डेमुक्त नगरसाठी काय प्रयत्न केले का, हा प्रश्नच आहे. सत्ता स्थापनेनंतर महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, याची दालने चकाचक झाली खरी; पण कारभाराला वेग मिळाला नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे.

..

पाऊस संपला की खड्डे बुजवू

सध्या अधूनमधून पाऊस सुरू असतो. पावसात रस्त्यांची डागडुजी करणे शक्य नाही. सध्या हवामान खातेही वारंवार पावसाचे अंदाज देत असते. त्यामुळे सध्या डागड़ुजी करणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते संजय शेंडगे, संभाजी कदम, सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. पाऊस थांबेपर्यंत लोकांनी खड्ड्यांत पडायचे का? असे पत्रकारांच्या प्रश्नावर या नेत्यांनी मात्र मौन बाळगले, तर शेंडगे यांनी एक कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली.

---------

सूचना फोटो: साजिद