शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव जोगे कालव्याचा पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST

अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावातील अनेक लाभार्थ्यांना पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी मिळाले नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी ...

अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावातील अनेक लाभार्थ्यांना पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी मिळाले नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी थेट अळकुटी येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले. मात्र, तेथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी संतप्त झाले.

पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी अळकुटी, लोणी मावळा, पाबळ आदी गावांना मिळते. कालव्याचे पाणी सोडून अनेक दिवस होऊन गेले. परंतु, पारनेर तालुक्यातील अनेक गावांना रब्बी हंगामातील पाणी मिळालेच नाही. त्यामुळे पिके संकटात असून, पाणी कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जाब विचारण्यासाठी थेट अळकुटी येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले.

यावेळी तेथे अधिकाऱ्यांसह एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेश सरडे यांनी दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरडे यांनी सांगितले. पाणी लवकर न मिळाल्यास लाभार्थी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य डाॅ. भास्करराव शिरोळे, संदेश कापसे, डाॅ. सुभाष मावळे, संतोष शेंडकर, संपत शेंडकर, देवराज शेंडकर, नानाभाऊ मावळे, रावसाहेब कवडे, अशोक शिरोळे, बाळासाहेब कवडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

---

पिंपळगाव जोगे कालवा हा प्रत्येक आवर्तनाला चर्चेचा विषय ठरतो. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. मग तो खरीप, रब्बी, उन्हाळी असा कोणताही हंगाम असो. पाणी वाटपा नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना नेहमीच संघर्ष करावा लागतो. त्यामुळे लवकरच आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन ही व्यथा मांडणार आहे.

-जितेश सरडे,

अळकुटी

---

१४ पिंपळगाव जोगे

पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले.