शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पिंपळगाव जोगे कालव्याचा पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST

अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावातील अनेक लाभार्थ्यांना पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी मिळाले नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी ...

अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावातील अनेक लाभार्थ्यांना पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी मिळाले नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी थेट अळकुटी येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले. मात्र, तेथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी संतप्त झाले.

पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी अळकुटी, लोणी मावळा, पाबळ आदी गावांना मिळते. कालव्याचे पाणी सोडून अनेक दिवस होऊन गेले. परंतु, पारनेर तालुक्यातील अनेक गावांना रब्बी हंगामातील पाणी मिळालेच नाही. त्यामुळे पिके संकटात असून, पाणी कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जाब विचारण्यासाठी थेट अळकुटी येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले.

यावेळी तेथे अधिकाऱ्यांसह एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेश सरडे यांनी दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरडे यांनी सांगितले. पाणी लवकर न मिळाल्यास लाभार्थी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य डाॅ. भास्करराव शिरोळे, संदेश कापसे, डाॅ. सुभाष मावळे, संतोष शेंडकर, संपत शेंडकर, देवराज शेंडकर, नानाभाऊ मावळे, रावसाहेब कवडे, अशोक शिरोळे, बाळासाहेब कवडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

---

पिंपळगाव जोगे कालवा हा प्रत्येक आवर्तनाला चर्चेचा विषय ठरतो. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. मग तो खरीप, रब्बी, उन्हाळी असा कोणताही हंगाम असो. पाणी वाटपा नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना नेहमीच संघर्ष करावा लागतो. त्यामुळे लवकरच आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन ही व्यथा मांडणार आहे.

-जितेश सरडे,

अळकुटी

---

१४ पिंपळगाव जोगे

पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले.