शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

आंदोलन शांततेत करा : जिल्हा प्रशासन, पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:55 IST

आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चा समितीने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

अहमदनगर : आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चा समितीने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सकल मराठा मोर्चा समितीच्या सदस्यांशी चर्चा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. राज्य शासनाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका त्यांना समजावून सांगितली. यावेळी सकल मराठा मोर्चा समितीचे सदस्य संभाजी दहातोंडे, गोरख दळवी, बाळासाहेब पवार, शिवाजीराव कराळे, अनुराधा येवले यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी प्राजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार शेख आदी उपस्थित होते. द्विवेदी म्हणाले की, हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रशासनाला सहकार्य करणे आणि जिल्ह्यातील शांततामय वातावरण बिघडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. या आंदोलनात बाह्य शक्ती घुसणार नाहीत, याची दक्षताही आंदोलकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासन तुमची भूमिका निश्चितपणे राज्य शासनापर्यंत पोहोचवेल. त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे आंदोलन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी झालेले मराठा क्रांती मोर्चा व इतर आंदोलने शांततामय मार्गाने झाले आहेत त्यामुळे ९ आॅगस्टचे आंदोलनही शांततामय पद्धतीने करावे. जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात १५० अधिकारी, दोन हजार पोलीस कर्मचारी, ८०० होमगार्डस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त असणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयahmednagar policeअहमदनगर पोलीसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा