शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

आंदोलन शांततेत करा : जिल्हा प्रशासन, पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:55 IST

आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चा समितीने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

अहमदनगर : आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चा समितीने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सकल मराठा मोर्चा समितीच्या सदस्यांशी चर्चा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. राज्य शासनाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका त्यांना समजावून सांगितली. यावेळी सकल मराठा मोर्चा समितीचे सदस्य संभाजी दहातोंडे, गोरख दळवी, बाळासाहेब पवार, शिवाजीराव कराळे, अनुराधा येवले यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी प्राजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार शेख आदी उपस्थित होते. द्विवेदी म्हणाले की, हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रशासनाला सहकार्य करणे आणि जिल्ह्यातील शांततामय वातावरण बिघडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. या आंदोलनात बाह्य शक्ती घुसणार नाहीत, याची दक्षताही आंदोलकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासन तुमची भूमिका निश्चितपणे राज्य शासनापर्यंत पोहोचवेल. त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे आंदोलन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी झालेले मराठा क्रांती मोर्चा व इतर आंदोलने शांततामय मार्गाने झाले आहेत त्यामुळे ९ आॅगस्टचे आंदोलनही शांततामय पद्धतीने करावे. जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात १५० अधिकारी, दोन हजार पोलीस कर्मचारी, ८०० होमगार्डस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त असणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयahmednagar policeअहमदनगर पोलीसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा