शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग हवा

By admin | Updated: June 2, 2014 00:38 IST

अहमदनगर : सरकारची कोणतीही योजना लोकहितासाठीच असते. ती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाचा भाग म्हणून तिची अंमलबजावणी करीत असतात.

अहमदनगर : सरकारची कोणतीही योजना लोकहितासाठीच असते. ती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाचा भाग म्हणून तिची अंमलबजावणी करीत असतात. मात्र, तिचे यशापयश हे लोकसहभागावर अवलंबून असते. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम अशक्य आहे. त्यामुळे लोकांनी प्रत्येकवेळी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कवडे यांनी शनिवारी सायंकाळी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी शासनाच्या योजना, अधिकारी, कर्मचार्‍यांची मानसिकता आणि राजकीय पुढार्‍यांचे सामाजिक योगदान आणि अगदी अवैध वाळूउपसापासून पाणलोटविकासापर्यंत विविध विषयांवर संपादकीय विभागाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांच्यासोबत कर्जतचे उपविभागीय अधिकारी मिश्रा हेही उपस्थित होते. आवृत्ती प्रमुख अनंत पाटील, सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे यांनी त्यांचे स्वागत केले. पाणलोटासाठी सरकारी अनेक योजना आहेत. परंतु लोकांनी पुढाकार घेतल्यास त्याला मूर्त स्वरूप येऊ शकते. योजनेत ग्रामस्थांचा सहभाग असला तर त्यात आपलेपणाची भावना निर्माण होते. ही भावना असेल तर योजना दीर्घ काळ टिकते. पूर्वी गावात रात्रीच्या वेळी गावकरीच गस्त घालून आपले संरक्षण करीत. पोलीस यंत्रणा असो नाही तर महसूल त्यांना मर्यादा आहेत. प्रत्येक काम सरकारने करावे अशी लोकांची भावना आहे. पण आपलेही उत्तरदायीत्त्व लोकांनी विरसता कामा नये. पूर्वी गावात रामायण, महाभारत, नवनाथाचे ग्रंथ वाचले जायचे. विविध माध्यमांतून लोकांना मार्गदर्शन होई. मात्र, आता टी.व्ही.मुळे मार्गदर्शनाचा प्रश्नच राहिला नाही. याचाही परिणाम होतो आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी) वाळूतस्करांवर कारवाई वाळू उपसा रोखण्यासाठी त्रिस्तरीय पथके नेमली आहे. मुख्य रस्त्यांवर चेक नाके आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही वाळू चोरी होते. ही वस्तुस्थिती आहे. ही रोखण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला मदत केली पाहिजे. तसे झाल्याशिवाय तस्करी रोखता येणार नाही. कारण प्रशासनालाही मर्यादा आहेत, असे ते म्हणाले. अनुकरण का होत नाही राळेगणसिद्धी व हिवरे बाजार ही गावे जगाच्या नकाशावर आली आहे, ते केवळ लोकसहभागामुळेच. मात्र, हा लोकसहभाग वाढविण्यासाठी तेथील अण्णा हजारे व पोपटराव पवारांसारखे नेतृत्व पुढे आले. विकासात स्वयंप्रेरणा फार महत्त्वाची आहे. परंतु या गावांचीच उदाहरणे किती दिवस आपण देत राहणार. त्यांचा आदर्श घेऊन इतर गावे का अनुकरण करीत नाहीत. याचाही शोध घेतला पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.