शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग हवा

By admin | Updated: June 2, 2014 00:38 IST

अहमदनगर : सरकारची कोणतीही योजना लोकहितासाठीच असते. ती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाचा भाग म्हणून तिची अंमलबजावणी करीत असतात.

अहमदनगर : सरकारची कोणतीही योजना लोकहितासाठीच असते. ती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाचा भाग म्हणून तिची अंमलबजावणी करीत असतात. मात्र, तिचे यशापयश हे लोकसहभागावर अवलंबून असते. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम अशक्य आहे. त्यामुळे लोकांनी प्रत्येकवेळी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कवडे यांनी शनिवारी सायंकाळी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी शासनाच्या योजना, अधिकारी, कर्मचार्‍यांची मानसिकता आणि राजकीय पुढार्‍यांचे सामाजिक योगदान आणि अगदी अवैध वाळूउपसापासून पाणलोटविकासापर्यंत विविध विषयांवर संपादकीय विभागाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांच्यासोबत कर्जतचे उपविभागीय अधिकारी मिश्रा हेही उपस्थित होते. आवृत्ती प्रमुख अनंत पाटील, सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे यांनी त्यांचे स्वागत केले. पाणलोटासाठी सरकारी अनेक योजना आहेत. परंतु लोकांनी पुढाकार घेतल्यास त्याला मूर्त स्वरूप येऊ शकते. योजनेत ग्रामस्थांचा सहभाग असला तर त्यात आपलेपणाची भावना निर्माण होते. ही भावना असेल तर योजना दीर्घ काळ टिकते. पूर्वी गावात रात्रीच्या वेळी गावकरीच गस्त घालून आपले संरक्षण करीत. पोलीस यंत्रणा असो नाही तर महसूल त्यांना मर्यादा आहेत. प्रत्येक काम सरकारने करावे अशी लोकांची भावना आहे. पण आपलेही उत्तरदायीत्त्व लोकांनी विरसता कामा नये. पूर्वी गावात रामायण, महाभारत, नवनाथाचे ग्रंथ वाचले जायचे. विविध माध्यमांतून लोकांना मार्गदर्शन होई. मात्र, आता टी.व्ही.मुळे मार्गदर्शनाचा प्रश्नच राहिला नाही. याचाही परिणाम होतो आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी) वाळूतस्करांवर कारवाई वाळू उपसा रोखण्यासाठी त्रिस्तरीय पथके नेमली आहे. मुख्य रस्त्यांवर चेक नाके आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही वाळू चोरी होते. ही वस्तुस्थिती आहे. ही रोखण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला मदत केली पाहिजे. तसे झाल्याशिवाय तस्करी रोखता येणार नाही. कारण प्रशासनालाही मर्यादा आहेत, असे ते म्हणाले. अनुकरण का होत नाही राळेगणसिद्धी व हिवरे बाजार ही गावे जगाच्या नकाशावर आली आहे, ते केवळ लोकसहभागामुळेच. मात्र, हा लोकसहभाग वाढविण्यासाठी तेथील अण्णा हजारे व पोपटराव पवारांसारखे नेतृत्व पुढे आले. विकासात स्वयंप्रेरणा फार महत्त्वाची आहे. परंतु या गावांचीच उदाहरणे किती दिवस आपण देत राहणार. त्यांचा आदर्श घेऊन इतर गावे का अनुकरण करीत नाहीत. याचाही शोध घेतला पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.