शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग हवा

By admin | Updated: June 2, 2014 00:38 IST

अहमदनगर : सरकारची कोणतीही योजना लोकहितासाठीच असते. ती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाचा भाग म्हणून तिची अंमलबजावणी करीत असतात.

अहमदनगर : सरकारची कोणतीही योजना लोकहितासाठीच असते. ती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाचा भाग म्हणून तिची अंमलबजावणी करीत असतात. मात्र, तिचे यशापयश हे लोकसहभागावर अवलंबून असते. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम अशक्य आहे. त्यामुळे लोकांनी प्रत्येकवेळी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कवडे यांनी शनिवारी सायंकाळी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी शासनाच्या योजना, अधिकारी, कर्मचार्‍यांची मानसिकता आणि राजकीय पुढार्‍यांचे सामाजिक योगदान आणि अगदी अवैध वाळूउपसापासून पाणलोटविकासापर्यंत विविध विषयांवर संपादकीय विभागाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांच्यासोबत कर्जतचे उपविभागीय अधिकारी मिश्रा हेही उपस्थित होते. आवृत्ती प्रमुख अनंत पाटील, सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे यांनी त्यांचे स्वागत केले. पाणलोटासाठी सरकारी अनेक योजना आहेत. परंतु लोकांनी पुढाकार घेतल्यास त्याला मूर्त स्वरूप येऊ शकते. योजनेत ग्रामस्थांचा सहभाग असला तर त्यात आपलेपणाची भावना निर्माण होते. ही भावना असेल तर योजना दीर्घ काळ टिकते. पूर्वी गावात रात्रीच्या वेळी गावकरीच गस्त घालून आपले संरक्षण करीत. पोलीस यंत्रणा असो नाही तर महसूल त्यांना मर्यादा आहेत. प्रत्येक काम सरकारने करावे अशी लोकांची भावना आहे. पण आपलेही उत्तरदायीत्त्व लोकांनी विरसता कामा नये. पूर्वी गावात रामायण, महाभारत, नवनाथाचे ग्रंथ वाचले जायचे. विविध माध्यमांतून लोकांना मार्गदर्शन होई. मात्र, आता टी.व्ही.मुळे मार्गदर्शनाचा प्रश्नच राहिला नाही. याचाही परिणाम होतो आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी) वाळूतस्करांवर कारवाई वाळू उपसा रोखण्यासाठी त्रिस्तरीय पथके नेमली आहे. मुख्य रस्त्यांवर चेक नाके आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही वाळू चोरी होते. ही वस्तुस्थिती आहे. ही रोखण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला मदत केली पाहिजे. तसे झाल्याशिवाय तस्करी रोखता येणार नाही. कारण प्रशासनालाही मर्यादा आहेत, असे ते म्हणाले. अनुकरण का होत नाही राळेगणसिद्धी व हिवरे बाजार ही गावे जगाच्या नकाशावर आली आहे, ते केवळ लोकसहभागामुळेच. मात्र, हा लोकसहभाग वाढविण्यासाठी तेथील अण्णा हजारे व पोपटराव पवारांसारखे नेतृत्व पुढे आले. विकासात स्वयंप्रेरणा फार महत्त्वाची आहे. परंतु या गावांचीच उदाहरणे किती दिवस आपण देत राहणार. त्यांचा आदर्श घेऊन इतर गावे का अनुकरण करीत नाहीत. याचाही शोध घेतला पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.