शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

गद्दारांना गाडण्यासाठी जनता निवडणुकांची वाट पाहत आहे - सुभाष वानखेडे

By अरुण वाघमोडे | Updated: February 28, 2023 16:31 IST

ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवारी (28) नगर शहरात आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.

अहमदनगर : भाजपाने शिवसेनेसोबत राहून गद्दारी केली. या गद्दारांना गाडण्यासाठी आता सर्वसामान्य जनताच निवडणुकांची वाट पाहत आहे. हे सरकार मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करत नाही. कारण त्यांना पराभवाची भीती आहे. अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी राज्य सरकारवर केली. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवारी (28) नगर शहरात आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्याला महापौर रोहिणी शेंडगे, माजी आमदार विजय औटी, शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम, उल्हास पाटील, शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, सहसंपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. वानखेडे म्हणाले केंद्र सरकार देशातील कंपन्या विकत असून सध्या देशात अंदाधुंद कारभार सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही. शेतीमालाला भाव नाही. म्हणून राज्यात घटनाबाह्यरित्या स्थापन झालेल्या सरकारला जनता वैतागली आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर  जनता यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. यावेळी उपनेते विजय कदम, विनोद घोसाळकर, उल्हास पाटील, साईनाथ दुर्गे यांनीही राज्य सरकारवर टीका केली.या मेळाव्याला नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर व राहुरी तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान सभागृहात झालेल्या या मेळाव्याला अपेक्षित उपस्थिती नसल्याने उपनेते विजय कदम यांनी पदाधिकाऱ्यांवर चांगलेच नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना