शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

गद्दारांना गाडण्यासाठी जनता निवडणुकांची वाट पाहत आहे - सुभाष वानखेडे

By अरुण वाघमोडे | Updated: February 28, 2023 16:31 IST

ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवारी (28) नगर शहरात आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.

अहमदनगर : भाजपाने शिवसेनेसोबत राहून गद्दारी केली. या गद्दारांना गाडण्यासाठी आता सर्वसामान्य जनताच निवडणुकांची वाट पाहत आहे. हे सरकार मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करत नाही. कारण त्यांना पराभवाची भीती आहे. अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी राज्य सरकारवर केली. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवारी (28) नगर शहरात आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्याला महापौर रोहिणी शेंडगे, माजी आमदार विजय औटी, शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम, उल्हास पाटील, शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, सहसंपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. वानखेडे म्हणाले केंद्र सरकार देशातील कंपन्या विकत असून सध्या देशात अंदाधुंद कारभार सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही. शेतीमालाला भाव नाही. म्हणून राज्यात घटनाबाह्यरित्या स्थापन झालेल्या सरकारला जनता वैतागली आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर  जनता यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. यावेळी उपनेते विजय कदम, विनोद घोसाळकर, उल्हास पाटील, साईनाथ दुर्गे यांनीही राज्य सरकारवर टीका केली.या मेळाव्याला नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर व राहुरी तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान सभागृहात झालेल्या या मेळाव्याला अपेक्षित उपस्थिती नसल्याने उपनेते विजय कदम यांनी पदाधिकाऱ्यांवर चांगलेच नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना