शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दूषित पाण्यामुळे पाथर्डी, शेवगाव तालुके आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 15:41 IST

पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील ४८ गावांना पंधरा दिवसांपासून मळीसदृश रसायन मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने शेवगाव, पाथर्डी तालुका सध्या अनेक आजारांच्या विळख्यात आहे. अनेकजण पोटाच्या आजाराने त्रस्त आहेत.

हरिहर गर्जेपाथर्डी : पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील ४८ गावांना पंधरा दिवसांपासून मळीसदृश रसायन मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने शेवगाव, पाथर्डी तालुका सध्या अनेक आजारांच्या विळख्यात आहे. अनेकजण पोटाच्या आजाराने त्रस्त आहेत. पाणी योजनेद्वारे नाथसागर जलाशयातून या तालुक्यांना सध्या पाणी पुरवठा सुरु आहे.दूषित पाणी पुरवठ्यामुळे या तालुक्यांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील दूषित द्रव्यांमुळे लहान मुलांच्या वाढीवर, प्रौढ माणसे तसेच पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन नाथसागरातून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे हगवण, त्वचेचे विकार, काविळ, मुतखडा, कर्करोग तसेच इतर संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे. एका समाजसेवी संस्थेने विविध भागातील पाण्याचे नमुने घेतले असता या पाण्यात क्षार, लोह, जस्त, नायट्रेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याचे दिसून आले.

गोदावरी नदीच्या पाण्यात ठिकठिकाणच्या साखर कारखान्यातील रसायनांचे दूषित पाणी, मळी तसेच शहरातील सांडपाणी ओढ्याव्दारे नदीपात्रात सोडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे धरण कार्यक्षेत्रापासून रसायनांच्या कारखान्यांना बंदी घालून अशा कारखान्यांचे सांडपाणी थेट नद्यांमध्ये न सोडता त्याचे शुद्धीकरण करून शेतीसाठी वापर करावा, असा पर्याय पुढे आला आहे.पिण्यासाठी पुरविण्यात येणाºया पाण्याच्या बदल्यात नागरिकांकडून पाथर्डी पालिका पाणीपट्टीच्या नावाखाली मोठा कर वसूल करते, परंतु या पाणीपट्टी कराच्या बदल्यात दर्जेदार सेवा देण्यास पालिकेची यंत्रणा कमी पडताना दिसून येते. उपसा पंपाच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. पालिका व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या बेजबाबदार कारभारामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांना गाळ, मळी, शेवाळ मिश्रित दूषित पाणी प्यावे लागत आहे. जिल्ह्यातील पाण्याची शुद्धता तपासणारी यंत्रणा मूग गिळून गप्प आहे. दूषित पाणी पुरवठा होत असल्यास त्याची जबाबदारी पालिकेची नाही असे उत्तर पाथर्डी पालिका पाणीपुरवठा विभागाकडून मिळत आहे.पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने देखभाल दुरुस्तीसाठी मे. संकेत एंटर प्रायजेस, नेवासा यांना २३ नोव्हेंबर २००७ पासून नोटीस दिली आहे. निविदेच्या १२ महिने मुदत संपल्या नंतरही पुढे आजपर्यंत पुन्हा सदर योजना देखभाल दुरुस्ती व्यवस्थापनासाठी पूर्वीच्याच संस्थेला मुदत वाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावPathardiपाथर्डी