शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ४४ कर्मचाऱ्यांवर हल्ले

By admin | Updated: May 26, 2016 23:57 IST

अण्णा नवथर, अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड आणि भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांकडून गेल्या पाच वर्षांत ४४ महसूल कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले

अण्णा नवथर, अहमदनगरजिल्ह्यातील गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड आणि भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांकडून गेल्या पाच वर्षांत ४४ महसूल कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत़ सर्वाधिक तलाठी व मंडल अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत़ त्यामुळे वाळूच्या कामातून मुक्त करण्याची मागणी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांकडून जोरकसपणे पुढे येत आहे़ जिल्ह्यातून गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड आणि भीमा नदी जाते़ नदीपात्रातील वाळू पट्टयांचे रितसर लिलाव होत असतात़ मात्र लिलावाकडे ठेकेदार पाठ फिरवितात़ रितसर वाळू विकत न घेता अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात सक्रिय आहेत़ प्रशासनाकडून वाळूमाफियांविरोधात ठोस मोहीम उघडली जात नाही़ त्यामुळे त्यांची मुजोरी वाढली आहे़ कारवाईसाठी आलेल्या पथकावरच त्यांच्याकडून हल्ले होतात़ राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावरच प्राणघातक हल्ला झाला़ वाळूमाफियांनी अंधाराचा फायदा घेऊन गलोलीव्दारे पथकाच्या दिशेने दगड भिरकावले़ त्यात पथकातील कर्मचारी गंभीर जखमी झाले़ एकाच महिन्यात अशा तीन वेगवेगळ्या घटना घडल्या़ त्यामध्ये गाव पातळीवर काम करणारे तलाठी व मंडलाधिकारी जबर जखमी झाले़ कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे वाळूमाफिया मात्र मोकाट आहेत़ काही ठिकाणी तर अंगावर वाहने घालण्याचा थरार घडला़ पण, काहींनी भितीपोटी तक्रार दिली नाही़ त्यामुळे मारहाणीच्या घटना समोर आल्या नाहीत़ अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी अनेक मोहिमा प्रशासनाने आखल्या़ मात्र त्या यशस्वी झाल्या नाहीत़ या मोहिमा यशस्वी न होण्यामागे अनेक कारणे आहेत़ त्याचा शोध घेण्याची गरज आहे़ सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे गाव पातळीवर काम करणाऱ्या तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या संघटनांनी हे काम काढून घेण्याची मागणी केली आहे़ कर्मचाऱ्यांवरील होणारे हल्ले, हा प्रकार गंभीर आहे़ याची प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज आहे, असा सूर संघटनाकडून आळवला जात आहे़तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडून काढून घेण्याची मागणी महसूलमंत्र्यांकडे संघटनेने केली आहे. त्यांनी याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.-ज्ञानदेव भुजबळ, जिल्हाध्यक्ष, तलाठी महासंघ.