शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

पारनेर शहरानजीक चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2016 00:45 IST

पारनेर : पारनेर शहराजवळील लोणी रस्ता भागात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी सुमारे तीन तास धुमाकूळ घालीत चार ठिकाणी घरफोड्या केल्या

निकृष्ट काम : कळंब परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता, वंडलीतील शेताला तळ्याचे स्वरूपकळंब : बेंबळाच्या कालव्याचे काम अर्धवट व निकृष्ट करण्यात आल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी रस्त्यावरुन वाहात आहे. काहींच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वी आष्टा वितरिका फुटून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले होते. आजही हिच स्थिती अनेक गावात कायम आहे. वंडली येथील क्रिष्णा भाऊराव ओंकार यांचे तीन एकर शेत पाण्याखाली आले आहे. त्यांनी उसणवार करून ७० ते ८० हजार रुपये शेतीत खर्ची घातले. परंतु आता एक रुपयाही शेतीत मिळते की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते चिंताग्रस्त आहे. परिसरातील माटेगाव, सावरगाव, मंगरुळ, कळसपूर, परसोडी यासह अनेक गावातील शेतकऱ्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जमिनीत कायम ओलावा असल्यामुळे शेकडो एकर जमीन वांझोटी ठरली आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माटेगाव येथून बेंबळा प्रकल्पाची आष्टा वितरिका गेलेली आहे. ही वितरिका सिमेंट लाईनिंगची तयार करा, अशी मागणी अनेक वर्षापासूनची आहे. यासाठी अनेकदा निवेदन व आंदोलनही करण्यात आले. परंतु थातुरमातूर कामाव्यतिरिक्त काम पुढे सरकले नाही. बेंबळाचे पाणी चुकीच्या कामामुळे शेतापर्यंत पोहोचत नाही. दुसरीकडे याच प्रकल्पाच्या पाण्याने नली-नाले दुथडी भरून वाहतात. एका तपापासूनचे शेतकऱ्यांचे स्वप्न असणाऱ्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले नाही. यापूर्वी अनेकदा कालव्याद्वारे पाणी वाटपाची चाचपणी घेण्यात आली़ चाचणीनंतर प्रकल्पाच्या कामाचे पितळ उघडे पडले़ तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचे स्वप्न धुळीस मिळते की काय, अशी स्थिती आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची या प्रकल्पामुळे घोर निराशा झाली आहे़ चुकीचा सर्वेमुळे अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले. बहुतांश ठिकाणी कालव्याचे पाणी खाली व शेतजमीन वर, अशी स्थिती आहे़ अशा स्थितीत पाणी कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. (तालुका प्रतिनिधी)