शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पारनेर शहरानजीक चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2016 00:45 IST

पारनेर : पारनेर शहराजवळील लोणी रस्ता भागात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी सुमारे तीन तास धुमाकूळ घालीत चार ठिकाणी घरफोड्या केल्या

निकृष्ट काम : कळंब परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता, वंडलीतील शेताला तळ्याचे स्वरूपकळंब : बेंबळाच्या कालव्याचे काम अर्धवट व निकृष्ट करण्यात आल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी रस्त्यावरुन वाहात आहे. काहींच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वी आष्टा वितरिका फुटून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले होते. आजही हिच स्थिती अनेक गावात कायम आहे. वंडली येथील क्रिष्णा भाऊराव ओंकार यांचे तीन एकर शेत पाण्याखाली आले आहे. त्यांनी उसणवार करून ७० ते ८० हजार रुपये शेतीत खर्ची घातले. परंतु आता एक रुपयाही शेतीत मिळते की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते चिंताग्रस्त आहे. परिसरातील माटेगाव, सावरगाव, मंगरुळ, कळसपूर, परसोडी यासह अनेक गावातील शेतकऱ्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जमिनीत कायम ओलावा असल्यामुळे शेकडो एकर जमीन वांझोटी ठरली आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माटेगाव येथून बेंबळा प्रकल्पाची आष्टा वितरिका गेलेली आहे. ही वितरिका सिमेंट लाईनिंगची तयार करा, अशी मागणी अनेक वर्षापासूनची आहे. यासाठी अनेकदा निवेदन व आंदोलनही करण्यात आले. परंतु थातुरमातूर कामाव्यतिरिक्त काम पुढे सरकले नाही. बेंबळाचे पाणी चुकीच्या कामामुळे शेतापर्यंत पोहोचत नाही. दुसरीकडे याच प्रकल्पाच्या पाण्याने नली-नाले दुथडी भरून वाहतात. एका तपापासूनचे शेतकऱ्यांचे स्वप्न असणाऱ्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले नाही. यापूर्वी अनेकदा कालव्याद्वारे पाणी वाटपाची चाचपणी घेण्यात आली़ चाचणीनंतर प्रकल्पाच्या कामाचे पितळ उघडे पडले़ तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचे स्वप्न धुळीस मिळते की काय, अशी स्थिती आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची या प्रकल्पामुळे घोर निराशा झाली आहे़ चुकीचा सर्वेमुळे अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले. बहुतांश ठिकाणी कालव्याचे पाणी खाली व शेतजमीन वर, अशी स्थिती आहे़ अशा स्थितीत पाणी कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. (तालुका प्रतिनिधी)