शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

पारनेर शहरानजीक चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2016 00:45 IST

पारनेर : पारनेर शहराजवळील लोणी रस्ता भागात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी सुमारे तीन तास धुमाकूळ घालीत चार ठिकाणी घरफोड्या केल्या

निकृष्ट काम : कळंब परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता, वंडलीतील शेताला तळ्याचे स्वरूपकळंब : बेंबळाच्या कालव्याचे काम अर्धवट व निकृष्ट करण्यात आल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी रस्त्यावरुन वाहात आहे. काहींच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वी आष्टा वितरिका फुटून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले होते. आजही हिच स्थिती अनेक गावात कायम आहे. वंडली येथील क्रिष्णा भाऊराव ओंकार यांचे तीन एकर शेत पाण्याखाली आले आहे. त्यांनी उसणवार करून ७० ते ८० हजार रुपये शेतीत खर्ची घातले. परंतु आता एक रुपयाही शेतीत मिळते की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते चिंताग्रस्त आहे. परिसरातील माटेगाव, सावरगाव, मंगरुळ, कळसपूर, परसोडी यासह अनेक गावातील शेतकऱ्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जमिनीत कायम ओलावा असल्यामुळे शेकडो एकर जमीन वांझोटी ठरली आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माटेगाव येथून बेंबळा प्रकल्पाची आष्टा वितरिका गेलेली आहे. ही वितरिका सिमेंट लाईनिंगची तयार करा, अशी मागणी अनेक वर्षापासूनची आहे. यासाठी अनेकदा निवेदन व आंदोलनही करण्यात आले. परंतु थातुरमातूर कामाव्यतिरिक्त काम पुढे सरकले नाही. बेंबळाचे पाणी चुकीच्या कामामुळे शेतापर्यंत पोहोचत नाही. दुसरीकडे याच प्रकल्पाच्या पाण्याने नली-नाले दुथडी भरून वाहतात. एका तपापासूनचे शेतकऱ्यांचे स्वप्न असणाऱ्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले नाही. यापूर्वी अनेकदा कालव्याद्वारे पाणी वाटपाची चाचपणी घेण्यात आली़ चाचणीनंतर प्रकल्पाच्या कामाचे पितळ उघडे पडले़ तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचे स्वप्न धुळीस मिळते की काय, अशी स्थिती आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची या प्रकल्पामुळे घोर निराशा झाली आहे़ चुकीचा सर्वेमुळे अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले. बहुतांश ठिकाणी कालव्याचे पाणी खाली व शेतजमीन वर, अशी स्थिती आहे़ अशा स्थितीत पाणी कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. (तालुका प्रतिनिधी)