शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पंचायत राज कमिटीच्या स्वागतासाठी श्रीगोंद्यात अवतरला स्वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:27 IST

जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती तसेच गावागावांतील कामांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात काल पंचायत राज समिती दाखल झाली.

ठळक मुद्देस्वागतासाठी बंगलोरचे फुले, दिल्लीचे फ्रेशनर अन मुंबईचा सुकामेवा

श्रीगोंदा : जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती तसेच गावागावांतील कामांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात काल पंचायत राज समिती दाखल झाली. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेतील अधिका-यांची खरडपट्टी केल्यानंतर आज दुस-या दिवशी आज पंचायत राज समिती श्रीगोंदा पंचायत समितीत दाखल झाली. आपल्या कारभारावर ताशेरे न ओढण्यासाठी श्रीगोंदा पंचायत समिती प्रशासनाने कमिटीच्या स्वागतासाठी चक्क स्वर्गच निर्माण केला होता. यामुळे कमिटीमधील सदस्यांना स्वर्गात आल्याचा क्षणभर भास झाला.श्रीगोंदा पंचायत समितीमधील अधिका-यांनी आपल्या हलगर्जीपणाच्या कारभारावर पडदा टाकण्यासाठी समितीच्या स्वागताला बंगलोरचा फुलोत्सव, दिल्लीचे रुम फ्रेशनेर, मलमली गालीचे, खाण्यासाठी मुंबईचा सुकामेवा अन भोजनासाठी उस्मानाबादी बोकडाचे मटन असा पंचतारांकित बेत ठेवला होता. आगमनाचे स्वागत करण्यासाठी पंचायत समिती प्रवेशद्वारापासून गुलाबी रंगाचा गालीचा अंथरला होता. रंगीबेरंगी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. कमिटीचे मधुर शहनाई वादनाने स्वागत करण्यात आले. प्रत्येक सदस्याला ५०० रूपयांचा गोल्डन पेन देण्यात आला. हा शाही थाट पाहून सदस्यांना स्वर्गात आल्याचा भास झाला. समितीमधील सदस्यही या थाटामुळे गडबडले अन दोन मिनिटे ते बसलेही नाहीत.पंचायत समितीने स्वागतासाठी लाखोंची उधळपट्टी केली पण सदस्यांनी अवघ्या ३० मिनीटात आढावा घेतला. समिती मात्र उस्मानाबादी बोकडाच्या मटनाचा आस्वाद न घेताच हिरडगावकडे निघून गेली.फुलांकडे पाहून अहवाल देणार नाहीदुष्काळाचे सावट, हुमणी सारख्या किडीच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, पण श्रीगोंदा पंचायत समितीनेलाखो रुपये खर्च करून केलेला पाहुचार योग्य वाटला का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच कमिटीच्या सदस्यांनी पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तर जालन्यात चहाही पिलो नाही. श्रीगोंद्यात शाही स्वागत झाले झाले असल तरी आम्ही अहवाल फुलांकडे पाहून देणार नाही, असे पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा