शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पंचायत राज समिती : १५ दिवसांची तयारी आणि १२ तासांची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 16:44 IST

पंचायत राज समिती येणार म्हणुन नगर पंचायत समिती गेल्या १५ दिवसांपासून तयारी करत होती.

केडगाव : पंचायत राज समिती येणार म्हणुन नगर पंचायत समिती गेल्या १५ दिवसांपासून तयारी करत होती. सकाळी ७ वाजल्यापासून समितीची सुरू असलेली प्रतिक्षा तब्बल १२ तासांनी संपली. रात्री साडे नऊ वाजता एकदाची बैठक संपली आणि सर्वानींच सुटकेचा निश्वास टाकला. शालेय पोषण आहार, आरोग्य तपासणी, जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळेची गुणवत्ता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा तपशील या विषयाला धरुन पंचायत राज समितीने अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. समिती सदस्यांच्या प्रश्नांसमोर अधिका-यांची चांगलीच भंबेरी उडाली.नगर पंचायत समितीत पंचायत राज समितीने आधिका-यांची आढावा बैठक घेतली. शिक्षण विभागात शालेय तपासणी होते का? या तपासणी मध्ये कोण कोण असते? किती शाळांना भेटी दिल्या? याचा अहवाल सभापतींना कळवला का? प्राथमिक शाळांपेक्षा खाजगी शाळांचा दर्जा चांगला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेंच्या शिक्षकांना पन्नास हजार पगार आहे. खाजगी शाळेतील शिक्षकांना चार ते पाच हजार रुपये पगार आहे, तरी पण खाजगी शाळांचा दर्जा चांगला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील सातवीच्या मुलांना रवी शब्द इंग्रजीतून लिहिता येत नाही ही शोकांतिका आहे. मार्च अखेर ४८ लाख रुपये लाभार्थ्यांचे शिल्लक कसे राहिले? आरोग्य अधिकारी यांना विचारले शालेय तपासणी केली त्याचे वेळापत्रक आहे का? या पथकात कोण असते? वर्षभरात किती तपासणी होतात. याची माहिती शिक्षण विभागाला दिली का? अशा प्रश्नांची सरबत्ती झाल्याने अधिकारी गांगरून गेले.दरम्यान आरोग्य विभागाला विचारले की कुपोषीत बालके किती, जन्म-मृत्यू दर किती? किती महिलांना भेटी दिल्या? उपकेंद्राना भेटी दिल्या का? अहवाल आहे का? आहार दिला जातो का? याची कधी चौकशी पाहणी केली? बाल विकास अधिकारी यांना विचारले की कमी वजनाचे बालक किती?पाणी पुरवठा विभागाला हिंगणगाव येथील सदोष मीटर बाबत जाब विचारला, लवकरात लवकर मीटर बदला जास्त बील आले त्याची शहनीशा करा, असा आदेश दिला. या सर्व कामांचा अहवाल गटविकास अधिका-यांनी आम्हास द्यावा, अशा सूचना समितीने केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद