शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मंदीशी लढण्यासाठी हवी पंचसूत्री; मोफत साईदर्शन पासेसला मर्यादा हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 11:05 IST

सामान्य भाविकांना आनंददायी दर्शन, देणगीदारांना सन्मान, अनावश्यक खर्चात कपात, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व मनोरंजनाच्या साधनांची निर्मिती या पंचसूत्रीवर नियोजनबद्ध व कठोरपणे काम केले तरच साईसंस्थान आर्थिक मंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

प्रमोद आहेर । शिर्डी : सामान्य भाविकांना आनंददायी दर्शन, देणगीदारांना सन्मान, अनावश्यक खर्चात कपात, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व मनोरंजनाच्या साधनांची निर्मिती या पंचसूत्रीवर नियोजनबद्ध व कठोरपणे काम केले तरच साईसंस्थान आर्थिक मंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.साईसंस्थानने १९२५ मध्ये तांबे-पितळेची भांडी मोडून आरतीला चांदीचे तबक केले होते. फंड वाढवण्यासाठी चार आणे, रूपयाची तिकिटे काढून विकली, बाबांचे खराब झालेले शेले विकले, नाटकाचे प्रयोग केले, समाधीच्या सभामंडपाचे बांधकाम पैशाअभावी तेवीस वर्षे सुरू होते. कोर्ट रिसीव्हरच्या काळात पोस्टाने आलेली पाकिटे उलगडून त्याचा आतील कोरा भाग कच्च्या टिपणांसाठी वापरला जात होता. पाकिटावरील ज्या तिकीटावर शिक्का नाही ते अलगद काढून टपाल पाठवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला होता. अशा अनेक बºयावाईट प्रसंगाना तोंड देत साईसंस्थानने केलेली काटकसर, योग्य नियोजन, भाविकांचे दातृत्व व ग्रामस्थांच्या सहकार्यातून साईसंस्थानने आर्थिक यशाचे शिखर गाठले. भाविक-देणगीदारांशी संस्थानचे संबंधसाईसंस्थानने भाविकांचे दर्शन व वास्तव्य आनंददायी होण्यासाठी त्याला समाधी स्पर्शसुख अनुभवू द्यावे.  भक्तांना त्रास दिल्यास तो अक्षम्य गुन्हा समजला जावा़ पहिल्या व तिस-या सोमवारी शताब्दी मंडपात पादुका दर्शनासाठी ठेवाव्यात, देणगीदार लहान-मोठा किंवा ओळखीचा न बघता त्याला सन्मान द्यावा. देणगीदार व संस्थान यातील मध्यस्थ कमी करून संस्थानने थेट संपर्क ठेवावा. संस्थानच्या समाजोपयोगी प्रकल्पांची माहिती देणगीदारांपर्यंत पोहचवावी. प्रकल्पामध्ये देणगीदारांचा सहभाग वाढवावा. प्रकल्पांसाठी सीएसआर फंड मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. साईबाबांमुळे अनेकांचे मोठ्या व्यक्तींशी संबंध दृढ झाले आहेत, ते संस्थान व गावाच्या विकासासाठी वापरावेत. माजी विश्वस्त व अधिकाºयांना मोफत पासेसच्या मर्यादा निश्चित केल्या जाव्यात.     खर्च कपातीचे धोरण स्वीकारणे आवश्यकप्रसादालय पुन्हा सशुल्क करायला हवे. साईआश्रमचे, दर्शन-आरती पासचे दर वाढवायला हवेत. बाबांना येणाºया शालींचा नियमित लिलाव व्हावा. वाहनांचा अनावश्यक ताफा, विजेचा अनावश्यक वापर कमी करायला हवा आहे. संस्थानच्या पडीक जमिनीत भाजीपाला पिकवायला हवा. उठसुट कुणालाही मूर्ती भेट देणे टाळायला हवे. रूग्णालय व शैक्षणिक संस्थेसाठी कन्सल्टंट नियुक्त करून गुणवत्ता वाढीबरोबरच खर्च व उत्पन्नावर नियंत्रण ठेवायला हवे़ श्रमपरिहारच्या भोजनावळी बंद कराव्यात़ याशिवाय शासनाने उठसुट संस्थान तिजोरीत हात घालून  दानधर्म करण्याचा मोह काही वर्ष टाळला तरच साई संस्थानच्या आर्थिक आलेख वाढेल, असे जाणकार सांगतात.        

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर