शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

आर्थिक मंदीशी लढण्यासाठी हवी पंचसूत्री; मोफत साईदर्शन पासेसला मर्यादा हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 11:05 IST

सामान्य भाविकांना आनंददायी दर्शन, देणगीदारांना सन्मान, अनावश्यक खर्चात कपात, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व मनोरंजनाच्या साधनांची निर्मिती या पंचसूत्रीवर नियोजनबद्ध व कठोरपणे काम केले तरच साईसंस्थान आर्थिक मंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

प्रमोद आहेर । शिर्डी : सामान्य भाविकांना आनंददायी दर्शन, देणगीदारांना सन्मान, अनावश्यक खर्चात कपात, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व मनोरंजनाच्या साधनांची निर्मिती या पंचसूत्रीवर नियोजनबद्ध व कठोरपणे काम केले तरच साईसंस्थान आर्थिक मंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.साईसंस्थानने १९२५ मध्ये तांबे-पितळेची भांडी मोडून आरतीला चांदीचे तबक केले होते. फंड वाढवण्यासाठी चार आणे, रूपयाची तिकिटे काढून विकली, बाबांचे खराब झालेले शेले विकले, नाटकाचे प्रयोग केले, समाधीच्या सभामंडपाचे बांधकाम पैशाअभावी तेवीस वर्षे सुरू होते. कोर्ट रिसीव्हरच्या काळात पोस्टाने आलेली पाकिटे उलगडून त्याचा आतील कोरा भाग कच्च्या टिपणांसाठी वापरला जात होता. पाकिटावरील ज्या तिकीटावर शिक्का नाही ते अलगद काढून टपाल पाठवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला होता. अशा अनेक बºयावाईट प्रसंगाना तोंड देत साईसंस्थानने केलेली काटकसर, योग्य नियोजन, भाविकांचे दातृत्व व ग्रामस्थांच्या सहकार्यातून साईसंस्थानने आर्थिक यशाचे शिखर गाठले. भाविक-देणगीदारांशी संस्थानचे संबंधसाईसंस्थानने भाविकांचे दर्शन व वास्तव्य आनंददायी होण्यासाठी त्याला समाधी स्पर्शसुख अनुभवू द्यावे.  भक्तांना त्रास दिल्यास तो अक्षम्य गुन्हा समजला जावा़ पहिल्या व तिस-या सोमवारी शताब्दी मंडपात पादुका दर्शनासाठी ठेवाव्यात, देणगीदार लहान-मोठा किंवा ओळखीचा न बघता त्याला सन्मान द्यावा. देणगीदार व संस्थान यातील मध्यस्थ कमी करून संस्थानने थेट संपर्क ठेवावा. संस्थानच्या समाजोपयोगी प्रकल्पांची माहिती देणगीदारांपर्यंत पोहचवावी. प्रकल्पामध्ये देणगीदारांचा सहभाग वाढवावा. प्रकल्पांसाठी सीएसआर फंड मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. साईबाबांमुळे अनेकांचे मोठ्या व्यक्तींशी संबंध दृढ झाले आहेत, ते संस्थान व गावाच्या विकासासाठी वापरावेत. माजी विश्वस्त व अधिकाºयांना मोफत पासेसच्या मर्यादा निश्चित केल्या जाव्यात.     खर्च कपातीचे धोरण स्वीकारणे आवश्यकप्रसादालय पुन्हा सशुल्क करायला हवे. साईआश्रमचे, दर्शन-आरती पासचे दर वाढवायला हवेत. बाबांना येणाºया शालींचा नियमित लिलाव व्हावा. वाहनांचा अनावश्यक ताफा, विजेचा अनावश्यक वापर कमी करायला हवा आहे. संस्थानच्या पडीक जमिनीत भाजीपाला पिकवायला हवा. उठसुट कुणालाही मूर्ती भेट देणे टाळायला हवे. रूग्णालय व शैक्षणिक संस्थेसाठी कन्सल्टंट नियुक्त करून गुणवत्ता वाढीबरोबरच खर्च व उत्पन्नावर नियंत्रण ठेवायला हवे़ श्रमपरिहारच्या भोजनावळी बंद कराव्यात़ याशिवाय शासनाने उठसुट संस्थान तिजोरीत हात घालून  दानधर्म करण्याचा मोह काही वर्ष टाळला तरच साई संस्थानच्या आर्थिक आलेख वाढेल, असे जाणकार सांगतात.        

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर