शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानबरोबर युद्धच हवे - प्रवीण तोगडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 18:54 IST

जम्मूतील मुफ्ती मेहेबुबा यांचे सरकार बरखास्त करावे व पाकिस्तानबरोबर युद्ध करावे, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पत्रकारांशी बोलताना सूचित केले.

ठळक मुद्देजम्मूतील मुफ्ती मेहेबुबा यांचे सरकार बरखास्त करावे व पाकिस्तानबरोबर युद्ध करावेरोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हकलावेएकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे भारतीय सीमेवर सैनिक मरत आहेत.आजपर्यंत सर्वच सरकारचे शेतीविषयीचे चुकीचे धोरण असल्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत.

नेवासा : भारतीय सीमेवर झालेल्या पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याला रोहिंगिया मुसलमान जबाबदार असून, या मुस्लिमांना देशातून हाकलून जम्मूतील मुफ्ती मेहेबुबा यांचे सरकार बरखास्त करावे व पाकिस्तानबरोबर युद्ध करावे, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पत्रकारांशी बोलताना सूचित केले.नेवासा तालुका दौ-यावर असलेले डॉ. तोगडिया यांनी शनिवारी सुरुवातीला शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेऊन अभिषेक केला. यावेळी देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी तोगडिया यांचे स्वागत केले. त्यानंतर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तोगडिया यांचा सत्कार केला.देवगड येथे पत्रकारांशी बोलताना तोगडिया म्हणाले, भारतीय सीमेवर आर्मी कॅन्टोन्मेंटवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये दोन भारतीय सैनिक ठार झाले. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या आजूबाजूस रोहिंग्या मुसलमान राहतात. त्यामुळे हा हल्ला याच मुस्लिमांच्या सहकार्याने झालेला आहे. विश्व हिंदू परिषद काँग्रेसच्या सरकारपासून रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हकलावे, अशी मागणी करत आहे. या हल्ल्याचे स्वरूप पाहता पाकिस्तानशी युद्ध पुकारायला हवे. किती दिवस भेट, बोलणे चालणे चालणार आहे. आता फक्त युद्ध महत्त्वाचे आहे. आपल्याला अरब आणि पाकिस्तानशी गळाभेट करायची नाही. बंदुकीने उत्तर देण्याची गरज आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे भारतीय सीमेवर सैनिक मरत आहेत. ज्या देशात सैनिकांवर दगडफेक करणारांवरील खटले मागे घेतले जातात आणि जे सैनिक स्वत:चा बचाव करण्यासाठी गोळी चालवतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे सैनिकांची हिंमत कमी होणार आहे. जम्मूमधील मुफ्ती मेहबुबा यांचे सरकार बरखास्त करून पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची गरज आहे.तोगडिया म्हणाले, देशातील निम्म्याहून अधिक शेतक-यांवर कर्ज आहे. शेतक-यांच्या मालाला भाव नाही. उत्पादनखर्चाच्या दीडपट मूल्य शेतक-यांच्या मालाला मिळाला पाहिजे. कपाशी चार हजार रुपये भाव आणि उत्पादनखर्च सहा हजार रुपये असेल, तर शेतकरी आत्महत्या करणारच. आजपर्यंत सर्वच सरकारचे शेतीविषयीचे चुकीचे धोरण असल्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालास भाव मिळाल्यास कर्जबाजारी न होता आत्महत्या थांबतील. शिवाय सरकारला कर्ज उपलब्ध शेतकरी करून देतील. याबाबत जनजागृती करण्यासाठी मी लवकरच अभियान सुरू करणार आहे. आयात व निर्यातीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय विश्वस्त शिवाजी शेरकर, प्रदेशाध्यक्ष संजय बारगजे, बजरंग दल प्रदेश संयोजक सुनील चावरे, बाळू महाराज कानडे, संदीप साबळे उपस्थित होते.दरम्यान, देवगडजवळील जळका शिवारात तोगडिया यांनी शिवारफेरी मारली. त्यानंतर औरंगाबादला जाताना टोका येथील श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गोदावरी तीरावर पुष्प व श्रीफळ अर्पण करून गंगापूजन केले. सिद्धेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत बालब्रम्हचारी महाराज यांनी देवस्थानच्या वतीने तोगडिया यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, हिंदू हेल्प लाइनचे हेमंत त्रिवेदी, आप्पा बारगळ, रमेश गंगुले, भय्या कावरे, रमेश राजगिरे, प्रशांत बहिरट, गजानन गवारे आदी उपस्थित होते.

राममंदिर प्रश्नावर बगल

राममंदिर प्रश्न चर्चेतून सुटू शकतो का? असे विचारले असता तोगडिया म्हणाले, कोणते आपण दिवास्वप्न बघतो आहे. कित्येक वर्षांपासून दाढी, टोपीवाले यांनी ऐकले नाही आणि गांधी यांनी देशाचे तुकडे करूनही ते त्यांना समजावू शकले नाहीत. आता देशात कोणता असा नवीन गांधी जन्माला येतो आहे असे सांगून राममंदिर प्रश्नावर प्रवीण तोगडिया यांनी बगल दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा