शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

पाचपुते यांचे ‘कमबॅक’चे संकेत

By admin | Updated: October 27, 2016 00:51 IST

बाळासाहेब काकडे , श्रीगोंदा श्रीगोंदा बाजार समितीच्या तिरंगी लढतीत राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, आमदार राहुल जगताप गटाने १८ पैकी १० जागा जिंकून सत्तेत वर्चस्व

बाळासाहेब काकडे , श्रीगोंदाश्रीगोंदा बाजार समितीच्या तिरंगी लढतीत राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, आमदार राहुल जगताप गटाने १८ पैकी १० जागा जिंकून सत्तेत वर्चस्व अबाधित ठेवले. माजी मंत्री बबनराव पाचपुते गटाने एकाकी झुंज देत ८ जागा जिंकून तालुक्याच्या राजकारणात ‘कमबॅक’चे संकेत दिले. निवडणुकीत ‘लक्ष्मी’ दर्शन व कास्ट फॅक्टरच्या झेंड्यांचे पडसाद मतपेटीत उमटले. बाजार समिती सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी तालुक्यातील निरनिराळ्या निवडणुकींत नेहमी वेगळी भूमिका घेऊन सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांना जेरीस आणले होते. सर्वच पक्षांतील निरनिराळ्या पद्धतीने नाहाटा यांना चक्रव्यूहात अडकविण्यासाठी प्रयत्न झाला. नाहाटा यांनी अवघ्या ३४ मतांनी निवडणूक जिंकत चक्रव्यूह भेदला, मात्र मतदारांनी त्यांना जमिनीवर आणले. मात्र सभापतिपदाच्या निवडीत नाहाटा यांची हॅट्ट्रिक करण्यात कस लागणार आहे. सोसायटी मतदार संघात ११ पैकी ९ जागा सत्ताधारी गटाने जिंकल्या, परंतु या गटात पाचपुते यांचे ओबीसी प्रवर्गातील उमेदवार वैभव पाचपुते यांनी सर्वाधिक १ हजार १७२ मते, तर लक्ष्मण नलगे यांनी १०७९ मते मिळवून करिष्मा दाखविला. पाचपुते यांना सोसायटी मतदार संघात जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे यांची साथ मिळाली, ही वैभव पाचपुते यांची जमेची बाजू ठरली. सत्ताधारी गटाचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनसिंग भोयटे यांनी सोसायटी मतदार सर्वाधिक १०७९ मते मिळवून लोकप्रियता सिद्ध केली.ग्रामपंचायत मतदार संघात सत्ताधारी गटाच्या मीना आढाव यांनी धक्कादायक विजय मिळविला, तर विरोधी गटाच्या सुजाता जाधव यांनी स्वतंत्र यंत्रणा राबवून बाजार समितीत ‘एंन्ट्री’ केली. भाऊसाहेब कोथिंबिरे यांनी हमाली मापाडी मतदार संघातून विजय संपादन केला. सतीश पोखर्णा यांनी चौथ्यांदा विजय संपादन केला. नाहाटा यांनी ‘हॅट्ट्रिक’ केली मात्र विद्यमान सदस्य देवा शेळके यांना पराभवाला सामोर जावे लागले. विधानसभा निवडणुकीत राहुल जगताप यांना शिवाजीराव नागवडे, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा यांनी साथ दिली, परंतु त्यानंतर या नेत्यांमध्ये मतभेद झाले. बाजार समिती निवडणुकीत नागवडे, आ. जगताप यांनी पुन्हा मूठ बांधली, परंतु मतदारांची मूठ मात्र सैलच राहिली. दरम्यान, सत्तेत वर्चस्व कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले. भविष्यात एकत्रित राजकारणाशिवाय पर्याय नाही, असा बोध या निवडणुकीतून मिळाला. बबनराव पाचपुते यांनी ऊसबिलाचा प्रश्न असतानाही त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करीत कडवी झुंज दिली. घनश्याम शेलार यांनी तिसरा पॅनेल केला. त्यामुळे मतांची विभागणी झाली. यामध्ये मतदारांची दिवाळी मात्र गोड झाली.