शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

ऑक्सिजन टँकरबाबत हलगर्जीपणा, मंडलाधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST

अहमदनगर : ऑक्सिजन टँकर प्रकल्पाच्या स्थळावरून भरून तो जिल्हा रुग्णालयात येईपर्यंत टँकरसोबत राहण्याची जबाबदारी असलेले सुपा (ता. पारनेर) येथील ...

अहमदनगर : ऑक्सिजन टँकर प्रकल्पाच्या स्थळावरून भरून तो जिल्हा रुग्णालयात येईपर्यंत टँकरसोबत राहण्याची जबाबदारी असलेले सुपा (ता. पारनेर) येथील मंडलाधिकारी शिवाजी तुकाराम शिंदे यांनी त्यांची जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा केला. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पाहणीत टँकरचालक चाकण येथे टँकर थांबवून झोपले होते, तर मंडलाधिकारी घरीच असल्याचे निदर्शनास आले. या हलगर्जीपणामुळे मंडलाधिकारी शिंदे यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

शिवाजी शिंदे हे पारनेर तहसील कार्यालयांतर्गत महसूल विभागात अव्वल कारकून असून सुपा येथे अतिरिक्त मंडलाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिक्विड ऑक्सिजन टँकर चाकण, तळोजा, मुरबाड येथील ऑक्सिजन उत्पादक युनिटपासून अहमदनगर जिल्हा रुग्णालय, रिफिलर प्लांटपर्यंत विनाअडथळा पोहोचविणे यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांना सोमवार, गुरुवार आणि रविवार या तिन्ही दिवशी टँकर आणि पथकासोबत हजर राहण्याच्या सूचना आहेत. रविवारी (दि. २) रोजी लिंडे एअर प्रोडक्ट्स युनिटवरून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरून आणण्याची जबाबदारी दिली होती. सायंकाळी टँकर ताब्यात घेऊन तो उत्पादक युनिटकडे नेण्याची जबाबदारी होती. मात्र तशी कृती त्यांनी केली नाही.

२ मेच्या रात्री १०.३० वाजता शिंदे यांनी समन्वय अधिकाऱ्यांना मेसेज करून ऑक्सिजन टँकरच्या चालकाला झोप येत असल्याने तो चाकण येथे विश्रांती घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर समन्वय अधिकाऱ्यांनी रात्री अनेक वेळा टँकरचालक व शिंदे यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने टँकरबाबत सद्य:स्थिती लक्षात घेता आली नाही. पहाटे ४.३० वाजता संपर्क झाल्यानंतर शिंदे यांनी आपण घरी असल्याचे सांगितले. त्यांच्या हलगर्जीपणामुळे ऑक्सिजन टँकर वेळेवर जिल्हा रुग्णालयात पोहोचले नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे शासन सेवेतून निलंबन केले आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना निर्वाह भत्ता देण्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच त्यांचे यापुढचे मुख्यालय श्रीगोंदा येथील तहसील कार्यालय राहणार असून परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेशात बजावण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत हलगर्जीपणा केल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे.