शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

अन्यथा ऊस तोडणी बंद

By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील ऊस फडात साखर कारखान्यांनी ऊस तोड सुरू केली आहे़ मात्र उसाचा पहिला हप्ता गुलदस्त्यात ठेवला आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील ऊस फडात साखर कारखान्यांनी ऊस तोड सुरू केली आहे़ मात्र उसाचा पहिला हप्ता गुलदस्त्यात ठेवला आहे. उसाला पहिला हप्ता २ हजार २०० रुपयांनी द्यावा अन्यथा ५ नोव्हेंबरपासून ऊसतोड बंद करण्याचा इशारा कृषीवल ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष गणपतराव परकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.परकाळे म्हणाले की, सन २०१३-१४ मध्ये गाळप झालेल्या प्रति टनास शेतकऱ्यांना जादा भाव देण्यासाठी केंद्र शासनाने ३५० रुपये अनुदान दिले़ मात्र हे अनुदान साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना न देता अनुदानाची वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावली आहे़ त्यामुळे २ हजार १०० रुपयांच्या पुढे शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफ.आर.पी. उसाला २ हजार ३०० रुपयांनी भाव देणे बंधनकारक आहे. खत, बियाणे, मजुरी व मशागतीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे उसाची शेती हा भांडवली व्यवसाय झाला आहे़ त्यामुळे उसाला कारखान्यांनी प्रति टन ३ हजारांनी भाव देणे बंधनकारक आहे़श्रीगोंद्यात ३० ते ३१ लाख मेट्रीक टन ऊस आहे. श्रीगोंदा, कुकडी, साईकृपा, दौंड शुगर, बारामती अ‍ॅग्रो, अंबालिका आणि कारखान्याच्या ऊस तोडणी टोळ्या दाखल झाल्या आहे़ साखर कारखान्यांनी उसाला दर कमी दिला तर शेतकऱ्यांचा कोट्यावधीचा तोडा होणार आहे. तालुक्यातील नेते राजकारणात समोरासमोर येतात मात्र उसाच्या भावावर फिक्सींग करतात हा अनुभव सर्वांच्या जमेला आहे. (तालुका प्रतिनिधी)