शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा ऊस तोडणी बंद

By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील ऊस फडात साखर कारखान्यांनी ऊस तोड सुरू केली आहे़ मात्र उसाचा पहिला हप्ता गुलदस्त्यात ठेवला आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील ऊस फडात साखर कारखान्यांनी ऊस तोड सुरू केली आहे़ मात्र उसाचा पहिला हप्ता गुलदस्त्यात ठेवला आहे. उसाला पहिला हप्ता २ हजार २०० रुपयांनी द्यावा अन्यथा ५ नोव्हेंबरपासून ऊसतोड बंद करण्याचा इशारा कृषीवल ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष गणपतराव परकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.परकाळे म्हणाले की, सन २०१३-१४ मध्ये गाळप झालेल्या प्रति टनास शेतकऱ्यांना जादा भाव देण्यासाठी केंद्र शासनाने ३५० रुपये अनुदान दिले़ मात्र हे अनुदान साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना न देता अनुदानाची वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावली आहे़ त्यामुळे २ हजार १०० रुपयांच्या पुढे शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफ.आर.पी. उसाला २ हजार ३०० रुपयांनी भाव देणे बंधनकारक आहे. खत, बियाणे, मजुरी व मशागतीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे उसाची शेती हा भांडवली व्यवसाय झाला आहे़ त्यामुळे उसाला कारखान्यांनी प्रति टन ३ हजारांनी भाव देणे बंधनकारक आहे़श्रीगोंद्यात ३० ते ३१ लाख मेट्रीक टन ऊस आहे. श्रीगोंदा, कुकडी, साईकृपा, दौंड शुगर, बारामती अ‍ॅग्रो, अंबालिका आणि कारखान्याच्या ऊस तोडणी टोळ्या दाखल झाल्या आहे़ साखर कारखान्यांनी उसाला दर कमी दिला तर शेतकऱ्यांचा कोट्यावधीचा तोडा होणार आहे. तालुक्यातील नेते राजकारणात समोरासमोर येतात मात्र उसाच्या भावावर फिक्सींग करतात हा अनुभव सर्वांच्या जमेला आहे. (तालुका प्रतिनिधी)