शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

श्रीगोंद्यातील शेतक-यांना फळबागांची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 15:01 IST

कोरोनाकाळात भाजीपाला शेती तोट्याची ठरली. कुकडी, घोड धरणाच्या पाण्याचीही हमी राहिली नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकºयांनी आता फळबाग लागवडीकडे मोर्चा वळविला आहे. 

बाळासाहेब काकडे  । 

श्रीगोंदा : कोरोनाकाळात भाजीपाला शेती तोट्याची ठरली. कुकडी, घोड धरणाच्या पाण्याचीही हमी राहिली नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांनी आता फळबाग लागवडीकडे मोर्चा वळविला आहे. 

२०२०-२१ मध्ये श्रीगोंदा तालुका कृषी विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ३५० हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आगामी तीन वर्षात तीन कोटीचे अनुदान मिळणार आहे. तालुक्यातील विविध भागातील शेती आणि शेतीच्या बांधावर फळबाग लागवडीची धूम सुरू होणार आहे. यामध्ये लिंबू, चिकू, सीताफळ, आंबा, चिंच, नारळ, संत्रासारख्या फळबागांना खड्डे खोदणे लागवडीपासून तीन वर्षे फळबागांचे संगोपन करण्यासाठी शासन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून अनुदान देणार आहे. 

शेतातील व बांधावर आंबा, काजू, बोर, सीताफळ, लिंबू, कवट, जांभूळ, नारळ, साग, संत्रा, सोनचाफा, कडीपत्ता, कडूनिंब, शेवगा, हादगा आदी फळझाडे लावता येतील. अशोक, हिरडा, बेरडा, अर्जुन आदी औषधी वनस्पती, झाडे लागवड करता येणार आहे. याचा लाभ अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, दारिद्रय रेषेखालील, मनरेगा जॉबकार्डधारक लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. लाभार्थ्यांच्या नावास ग्रामसभेचा मंजुरी आवश्यक आहे.

शासनाने सर्वसामान्य शेतक-यांना आर्थिक स्थैर्य येण्यासाठी फळबाग लागवड योजना आणली आहे. या योजनेसाठी मनरेगा योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत.  -पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा