शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

श्रीगोंद्यातील शेतक-यांना फळबागांची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 15:01 IST

कोरोनाकाळात भाजीपाला शेती तोट्याची ठरली. कुकडी, घोड धरणाच्या पाण्याचीही हमी राहिली नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकºयांनी आता फळबाग लागवडीकडे मोर्चा वळविला आहे. 

बाळासाहेब काकडे  । 

श्रीगोंदा : कोरोनाकाळात भाजीपाला शेती तोट्याची ठरली. कुकडी, घोड धरणाच्या पाण्याचीही हमी राहिली नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांनी आता फळबाग लागवडीकडे मोर्चा वळविला आहे. 

२०२०-२१ मध्ये श्रीगोंदा तालुका कृषी विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ३५० हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आगामी तीन वर्षात तीन कोटीचे अनुदान मिळणार आहे. तालुक्यातील विविध भागातील शेती आणि शेतीच्या बांधावर फळबाग लागवडीची धूम सुरू होणार आहे. यामध्ये लिंबू, चिकू, सीताफळ, आंबा, चिंच, नारळ, संत्रासारख्या फळबागांना खड्डे खोदणे लागवडीपासून तीन वर्षे फळबागांचे संगोपन करण्यासाठी शासन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून अनुदान देणार आहे. 

शेतातील व बांधावर आंबा, काजू, बोर, सीताफळ, लिंबू, कवट, जांभूळ, नारळ, साग, संत्रा, सोनचाफा, कडीपत्ता, कडूनिंब, शेवगा, हादगा आदी फळझाडे लावता येतील. अशोक, हिरडा, बेरडा, अर्जुन आदी औषधी वनस्पती, झाडे लागवड करता येणार आहे. याचा लाभ अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, दारिद्रय रेषेखालील, मनरेगा जॉबकार्डधारक लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. लाभार्थ्यांच्या नावास ग्रामसभेचा मंजुरी आवश्यक आहे.

शासनाने सर्वसामान्य शेतक-यांना आर्थिक स्थैर्य येण्यासाठी फळबाग लागवड योजना आणली आहे. या योजनेसाठी मनरेगा योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत.  -पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा