शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यातील शेतक-यांना फळबागांची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 15:01 IST

कोरोनाकाळात भाजीपाला शेती तोट्याची ठरली. कुकडी, घोड धरणाच्या पाण्याचीही हमी राहिली नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकºयांनी आता फळबाग लागवडीकडे मोर्चा वळविला आहे. 

बाळासाहेब काकडे  । 

श्रीगोंदा : कोरोनाकाळात भाजीपाला शेती तोट्याची ठरली. कुकडी, घोड धरणाच्या पाण्याचीही हमी राहिली नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांनी आता फळबाग लागवडीकडे मोर्चा वळविला आहे. 

२०२०-२१ मध्ये श्रीगोंदा तालुका कृषी विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ३५० हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आगामी तीन वर्षात तीन कोटीचे अनुदान मिळणार आहे. तालुक्यातील विविध भागातील शेती आणि शेतीच्या बांधावर फळबाग लागवडीची धूम सुरू होणार आहे. यामध्ये लिंबू, चिकू, सीताफळ, आंबा, चिंच, नारळ, संत्रासारख्या फळबागांना खड्डे खोदणे लागवडीपासून तीन वर्षे फळबागांचे संगोपन करण्यासाठी शासन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून अनुदान देणार आहे. 

शेतातील व बांधावर आंबा, काजू, बोर, सीताफळ, लिंबू, कवट, जांभूळ, नारळ, साग, संत्रा, सोनचाफा, कडीपत्ता, कडूनिंब, शेवगा, हादगा आदी फळझाडे लावता येतील. अशोक, हिरडा, बेरडा, अर्जुन आदी औषधी वनस्पती, झाडे लागवड करता येणार आहे. याचा लाभ अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, दारिद्रय रेषेखालील, मनरेगा जॉबकार्डधारक लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. लाभार्थ्यांच्या नावास ग्रामसभेचा मंजुरी आवश्यक आहे.

शासनाने सर्वसामान्य शेतक-यांना आर्थिक स्थैर्य येण्यासाठी फळबाग लागवड योजना आणली आहे. या योजनेसाठी मनरेगा योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत.  -पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा