शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध; श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषण

By शिवाजी पवार | Updated: October 17, 2023 14:41 IST

दुष्काळी स्थितीमुळे वाद

लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात येथील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले.

भंडारदरा धरणाचे लाभक्षेत्र असलेल्या संगमनेर, राहता, श्रीरामपूर व नेवासे तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यातच जायकवाडी धरणात समन्यायी पाणी कायद्यानुसार पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर अखेर जायकवाडी ६५ टक्के पाणीसाठा झाला नाही तर नगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडले जाते. या कायद्याला नगर जिल्ह्यात विरोध होतो आहे.  येथील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या वडाळा उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी १०० -१२५ शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

वडाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना समन्यायी कायदा रद्द करण्याचे निवेदन देण्यात आले. मंगळवारी (दि.१७)  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे कार्यालयात होणाऱ्या पाणी नियोजन बैठकीत भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे म्हणणे तेथील कार्यकारी संचालकांना मेलद्वारे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण