शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नाला विरोधकांनीच खोडा घातला-स्नेहलता कोल्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 15:52 IST

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी महसूलमंत्री असताना कोपरगाव नगरपालिका साठवण तळ््यासाठी येसगाव परिसरात पालिकेला शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज शहरवासीयांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नाची काही प्रमाणात सोडवणूक झाली. ही वस्तुस्थिती विरोधक नाकारत असून पाणीप्रश्नी त्यांचे फक्त राजकारण सुरू आहे. आपल्या प्रयत्नांना कुणीही एकत्रित साथ देत नाही, अशी खंत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.

कोपरगाव : माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी महसूलमंत्री असताना कोपरगाव नगरपालिका साठवण तळ््यासाठी येसगाव परिसरात पालिकेला शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज शहरवासीयांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नाची काही प्रमाणात सोडवणूक झाली. ही वस्तुस्थिती विरोधक नाकारत असून पाणीप्रश्नी त्यांचे फक्त राजकारण सुरू आहे. आपल्या प्रयत्नांना कुणीही एकत्रित साथ देत नाही, अशी खंत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.शहरातील दत्तनगर परिसरात बुधवारी सायंकाळी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. निळवंडे शिर्डी कोपरगाव पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे, असा निर्धार कोल्हे यांनी व्यक्त केला. प्रारंभी नगरसेवक शिवाजी खांडेकर, गटनेते रवींद्र पाठक, फिरोज पठाण यांनी केंद्र व राज्य शासनामार्फत शहर विकासासाठी कोणत्या योजना आणल्या आणि भविष्यकालीन संकल्पना काय आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. अविनाश पाठक, सनी वाघ यांच्यासह छत्रपती बॉईज आणि मावळा ग्रुपच्या युवकांनी आमदार कोल्हे यांच्या विकास कामाची माहिती जाणून घेतली.कोल्हे म्हणाल्या, शहरवासीयांना पिण्याचे शुध्द २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. सध्या चार आणि पाच नंबर साठवण तळे कामासंदर्भात विरोधक उलटसुलट माहिती देऊन आपल्याविषयी नागरिकांना भडकावून देण्याचे काम करीत आहेत. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. पाच नंबर साठवण तळ्याचे काम मार्गी लागावे. यासाठी पाठपुरावा केला. पाच नंबर साठवण तळ्याचे काम लवकर व्हावे. त्यात आपली आडकाठी नाही, मात्र निळवंडे शिर्डी पाणी योजना पहिल्या टप्प्यात सुरू होताना पुढे कोपरगावपर्यंत केली असताना त्यास औरंगाबाद खंडपीठात वेगवेगळ्या ठिकाणांहून याचिका दाखल करून आडकाठी आणली. पण ही योजना आपणच पूर्ण करणार आहोत. शहर विकासाचे वैभव वाढवून येथील ऐतिहासिक स्थळांचे पर्यटकीय महत्व ओळखून त्यावर काम केले आहे. उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019