शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बेरोजगारीत करपलेय अवघे आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 17:49 IST

वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेले काहीजण तर काहीजण नुकतीच मिसरुड फुटलेले आणि बेरोजगारीच्या चक्रव्यूहात आयुष्य करपून दाढीची खुंटं पांढरे झालेले काहीजण असे सारे एकाच रांगेत उभे आहेत.

विनोद गोळेपारनेर : वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेले काहीजण तर काहीजण नुकतीच मिसरुड फुटलेले आणि बेरोजगारीच्या चक्रव्यूहात आयुष्य करपून दाढीची खुंटं पांढरे झालेले काहीजण असे सारे एकाच रांगेत उभे आहेत. नोकरीच्या शोधात़ बेरोजगारीचे हे भयावह चित्र सुपा येथील नोकरी मेळाव्यात दिसून आले़दहावीपासून ते इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलेले असे हजारोजण नोकरी मेळाव्याच्या रांगेत बेकारीचा शिक्का पुसण्यासाठी उभे होते़ जमीन आहे, पण पाणी नाही़ पाणी जरी असले तरी शेतमालाला भाव नाही़ त्यामुळे कुटुंबकबिला चालवायचा कसा? या प्रश्नाच्या विवंचनेने मिसरुड फुटलेला तरुणही नोकरी मेळाव्याच्या रांगेत होता़ आई, वडिलांची अपेक्षा मुलाने नोकरी करावी़ पण नोकरी मिळत नाही़ आई, वडिलांना आधार द्यायचाय, पण तो आधार शोधायचा कुठे, असेही प्रश्न या तरुणाईच्या घोळक्यात डोकावत होते़ निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने सुपा येथे रविवारी नोकरी मेळावा आयोजित केला होता.मेळाव्यातील काही युवकांबरोबर ‘लोकमत’ने चर्चा केली़ त्यांच्या भावना जाणून घेतल्या़ नगर तालुक्यातील मेहेकरी येथील युवक किरण गर्जे, सोनू गर्जे, अमोल पालवे भेटले. घरी शेती आहे़ पण पावसाने धोका दिल्याने सर्व कुटुंब कर्जबाजारी झालेय़ म्हणून नोकरीच्या शोधात आल्याचे विक्रम गर्जे याने सांगितले. पारनेर तालुक्यातील मुंगशी येथील विक्रम थोरात, सिद्धेश्वरवाडीचे गोरक्षनाथ कावरे व बुगेवाडी येथील युवकांचीही हीच व्यथा़ यातील काही तरुण दहावी पास, काही बारावी, बहुतांशी तरुण पदवीधर, काही आयटीआय, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले होते़ युवतींची संख्याही मोठी होती़नोकरी मेळाव्यात सुमारे ७५ कंपन्यांनी सहभाग घेतला़ निलेश लंके यांनी युवकांची बेरोजगारी पाहूनच याचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जशा जागा उपलब्ध होतील तसा या मेळाव्यातील युवकांना रोजगार दिला जाईल़ सध्या सहा हजार युवकांच्या नोकरीचे नियोजन केले आहे.- दादा शिंदे, निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर तालुका

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर