शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

नगर शहरात फक्त तीनच कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST

अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी २७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ...

अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी २७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ९८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण वाढले असून ते आता ९७.१० टक्के इतके झाले आहे. सोमवारी जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत २३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार २३५ इतकी झाली आहे. नगर शहरातील रुग्ण कमी होऊन फक्त तीनच पॉझिटिव्ह आढळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७० आणि अँटिजेन चाचणीत १६० रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये कोपरगाव १, नगर ग्रामीण १, पारनेर १ आणि पाथर्डी २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३, अकोले ३, जामखेड २, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण ३, नेवासा ४, पारनेर ८, पाथर्डी २, राहुरी ३, संगमनेर १६, शेवगाव ३, श्रीगोंदा १३ आणि श्रीरामपूर ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत १६० जण बाधित आढळून आले. अकोले २१, जामखेड १७, कर्जत ५, कोपरगाव ५, नगर ग्रामीण ३, नेवासा ७, पारनेर २६, पाथर्डी १०, राहाता १०, राहुरी १४, संगमनेर ७, शेवगाव ८, श्रीगोंदा १७ आणि श्रीरामपूर १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

--------

बरे झालेली रुग्ण संख्या : २,७०,९८२

उपचार सुरू असलेले रुग्ण : २२३५

मृत्यू नोंद : ५,८७२

एकूण रुग्ण संख्या : २,७९,०८९