शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आंबेडकर जयंतीची शहरात एकच मिरवणूक

By admin | Updated: March 23, 2016 00:15 IST

अहमदनगर : नगर शहरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयतींच्या सात ते आठ मिरवणुका निघतात त्या ऐवजी यंदा एकच मिरवणूक काढण्यात येईल,

अहमदनगर : नगर शहरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयतींच्या सात ते आठ मिरवणुका निघतात त्या ऐवजी यंदा एकच मिरवणूक काढण्यात येईल, त्याला सर्व मंडळांनी सहमती दर्शविली आहे़ एकतेचा यानिमित्ताने संदेश जाईल अशी अपेक्षा रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी व्यक्त केली़ मार्च-एप्रिलमध्ये सण-उत्सवांची रेलचेल आहे. होळी, रंगपंचमी, तिथीनुसार शिवजयंती, गुडफ्रायडे, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीला प्रांताधिकारी वामन कदम, पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी अविनाश मोरे, कोतवालीचे अधिकारी सोमनाथ मालकर यांच्यासह समितीचे सदस्य, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी उपअधीक्षक बनसोडे म्हणाले, मिरवणूक, उत्सवांमध्ये नागरिकांनी घडणाऱ्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवावी. कुठे गडबड होण्याची शक्यता दिसल्यास याबाबत पोलिसांना सूचना द्याव्यात. कोणत्याही प्रकारे अनुचित घटनांना पायबंद घालता आला पाहिजे. नगर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे विकास करण्यासाठी स्पर्धा करावी, यासाठी कोणीही नगरमध्ये फिरकत नाही. नगरची ही ओळख पुसण्यासाठी पोलीस बळ नव्हे तर नागरिकांच्या सजगतेची गरज आहे. बंगल्याचा रुबाब वॉचमन नव्हे तर मालकच व्यवस्थितपणे ठेवू शकतो. सण-उत्सवासोबतच दुष्काळ स्थितीमुळे आंदोलनांची संख्याही वाढणार आहे. तिथेही कायदा-सुव्यवस्था ढासळणार नाही, याबाबत पोलिसांना सतर्क राहावे लागणार आहे. व्यक्तिगत मैत्रीमध्ये जात कधीच पाहिली जात नाही, मात्र सण-उत्सवामध्ये जातीच्या नावावर एकमेकांची डोकी फोडली जातात. तरुणांची माथी भडकवून देण्याचे काम अप्रत्यक्षपणे केले जात असल्याने दूध पोळायची वेळ येवू देऊ नये, असे आवाहन बनसोडे यांनी केले. या बैठकीत अशोक गायकवाड, उबेद शेख, संजय झिंजे, नीलिमा गायकवाड आदींनी विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)जयंतीला हवी सुट्टीतिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे शिवसेनेचे धोरण आहे. सध्या राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला सुट्टी असावी, असे उबेद शेख यांनी सूचना मांडली याबाबत अशोक गायकवाड हे स्पष्टीकरण देत असताना त्यांच्या विधानाला भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. सुट्टीबाबत तुम्ही सांगू नका. इथे भाषणबाजी करू नका, असे कुलकर्णी यांनी बजावले. त्यावेळी गायकवाड यांनी त्यांना सत्ता आपलीच आहे,याची आठवण करून दिली. धोरणे ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी जे ठरविले, त्याची अंमलबजावणी करताना शांतता राखावी असे बनसोडे यांनी स्पष्ट केले़