शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

आंबेडकर जयंतीची शहरात एकच मिरवणूक

By admin | Updated: March 23, 2016 00:15 IST

अहमदनगर : नगर शहरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयतींच्या सात ते आठ मिरवणुका निघतात त्या ऐवजी यंदा एकच मिरवणूक काढण्यात येईल,

अहमदनगर : नगर शहरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयतींच्या सात ते आठ मिरवणुका निघतात त्या ऐवजी यंदा एकच मिरवणूक काढण्यात येईल, त्याला सर्व मंडळांनी सहमती दर्शविली आहे़ एकतेचा यानिमित्ताने संदेश जाईल अशी अपेक्षा रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी व्यक्त केली़ मार्च-एप्रिलमध्ये सण-उत्सवांची रेलचेल आहे. होळी, रंगपंचमी, तिथीनुसार शिवजयंती, गुडफ्रायडे, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीला प्रांताधिकारी वामन कदम, पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी अविनाश मोरे, कोतवालीचे अधिकारी सोमनाथ मालकर यांच्यासह समितीचे सदस्य, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी उपअधीक्षक बनसोडे म्हणाले, मिरवणूक, उत्सवांमध्ये नागरिकांनी घडणाऱ्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवावी. कुठे गडबड होण्याची शक्यता दिसल्यास याबाबत पोलिसांना सूचना द्याव्यात. कोणत्याही प्रकारे अनुचित घटनांना पायबंद घालता आला पाहिजे. नगर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे विकास करण्यासाठी स्पर्धा करावी, यासाठी कोणीही नगरमध्ये फिरकत नाही. नगरची ही ओळख पुसण्यासाठी पोलीस बळ नव्हे तर नागरिकांच्या सजगतेची गरज आहे. बंगल्याचा रुबाब वॉचमन नव्हे तर मालकच व्यवस्थितपणे ठेवू शकतो. सण-उत्सवासोबतच दुष्काळ स्थितीमुळे आंदोलनांची संख्याही वाढणार आहे. तिथेही कायदा-सुव्यवस्था ढासळणार नाही, याबाबत पोलिसांना सतर्क राहावे लागणार आहे. व्यक्तिगत मैत्रीमध्ये जात कधीच पाहिली जात नाही, मात्र सण-उत्सवामध्ये जातीच्या नावावर एकमेकांची डोकी फोडली जातात. तरुणांची माथी भडकवून देण्याचे काम अप्रत्यक्षपणे केले जात असल्याने दूध पोळायची वेळ येवू देऊ नये, असे आवाहन बनसोडे यांनी केले. या बैठकीत अशोक गायकवाड, उबेद शेख, संजय झिंजे, नीलिमा गायकवाड आदींनी विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)जयंतीला हवी सुट्टीतिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे शिवसेनेचे धोरण आहे. सध्या राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला सुट्टी असावी, असे उबेद शेख यांनी सूचना मांडली याबाबत अशोक गायकवाड हे स्पष्टीकरण देत असताना त्यांच्या विधानाला भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. सुट्टीबाबत तुम्ही सांगू नका. इथे भाषणबाजी करू नका, असे कुलकर्णी यांनी बजावले. त्यावेळी गायकवाड यांनी त्यांना सत्ता आपलीच आहे,याची आठवण करून दिली. धोरणे ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी जे ठरविले, त्याची अंमलबजावणी करताना शांतता राखावी असे बनसोडे यांनी स्पष्ट केले़