शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

मोठ्या पक्ष्यांच्या फक्त मोठ्या बाता, जनतेसाठी कुणी काही करत नाही, महादेव जानगरांची टीका 

By अरुण वाघमोडे | Updated: July 22, 2023 21:06 IST

म्हणूनच जनतेत जनजागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रासपचे संस्थापक, अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.

अहमदनगर: राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा जनतेच्या हितासाठी असून, कुणाच्या विरोधात नाही. प्रादेशिक पक्ष शेतकरी, कामगार हितासाठी संघर्ष करत आहेत. मोठमोठे पक्ष फक्त मोठमोठ्या बाता करतात, छोट्या माणसांची कामे करत नाही. म्हणूनच जनतेत जनजागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रासपचे संस्थापक, अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने महादेव जानकर यांनी काढलेली जनस्वराज्य यात्रा शनिवारी (दि.२२) शहरात दाखल झाली. यावेळी महिला आघाडीच्या वतीने चांदणी चौकात या यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जानकर बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे प्रदेश सचिव रविंद्र कोठारी, महिला आघाडीच्या दक्षिण जिल्हाध्यक्षा मंदाकिनी बडेकर-भगत, आशा वाकळे, निर्मला केदारी, वर्षा आढाव, वैशाली कांबळे, सारिका सिद्दम, रुबीना शेख, फिरोजा दीदी, जयश्री कांबळे, रूपाली पगारे, महादेव भगत, मेहर कांबळे, महेंद्र कांबळे, संजय भिंगारदिवे, मुन्ना शेख, विजय पठारे, अमोल कांबळे, सागर जाधव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जानकर म्हणाले पंढरपुरला विठ्ठलाला साकडे घालून गेल्या दहा दिवसांपासून ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. शेतकरी सुखी व्हावा, कामगारांना दिवस चांगले यावे व युवकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. महाराष्ट्रासह भारतभर विविध राज्यातून ही रथयात्रा मार्गक्रमण करणार आहे. ही यात्रा मार्गक्रमण करत असताना सर्व जनतेला जागृक करण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्षा मंदाकिनी बडेकर-भगत म्हणाल्या की, समाजाला दिशा देण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून होत आहे. महादेव जानकर यांच्या सक्षम नेतृत्वाने पक्षाची वाटचाल सुरु असून, जनस्वराज्य यात्रेने समाज जागृती होत असून, मोठा वर्ग पक्षाशी जोडला जात आहे. महिलांचे मोठे संघटन उभे करुन पक्षाला बळकट करण्याचे कार्य सुरु असून, जिल्ह्यात महिलांचे चांगले संघटन उभे राहिले असल्याचे, ते म्हणाल्या. 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरPoliticsराजकारण