शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ५३ शाळा ‘अ’ श्रेणी

By admin | Updated: October 2, 2014 23:49 IST

अहमदनगर : ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

अहमदनगर : ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्य सरकारकडून शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविला जात आहे. यात प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाने २०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवून त्यात नुसार आपल्या शाळेचा दर्जा निश्चित करण्यास सांगण्यात आलेले आहे. जिल्ह्यात अशा मूल्यांकनात अ श्रेणीत अवघ्या ५३ शाळा आल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेची नियमित तपासणी करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकासासाठी समृध्दी प्रकल्प राबविण्यात येत आहे. शाळेच्या स्वयंमूल्यमापनासाठी २०० गुणाची प्रश्न पत्रिका तयार करण्यात आली असून त्यात शालेय व्यवस्थापनासाठी ७५ गुण, लोकसहभागासाठी १२ गुण, शैक्षणिक संधी समानतेसाठी १३ गुण, शैक्षणिक गुणवत्तेसाठी १०० गुण ठेवण्यात आलेले आहेत.यात ज्या शाळेला ९० ते १०० गुण मिळतील तिला अ, ८० ते ८९ गुण मिळविणाऱ्या शाळेला ब, ६० ते ७९ गुणासाठी क, ४० ते ५९ गुणासाठी ड आणि शून्य ते ३९ गुणासाठी इ श्रेणी तयार करण्यात आलेली आहे. दरवर्षी साधारण सप्टेंंबर महिन्यांत हे मूल्यमापन होत असून त्यानुसार शाळेचा दर्जा निश्चित करण्यात येत आहे. प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकाने स्वत २०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवून त्याव्दारे आपल्या शाळेचा दर्जा ठरविण्यास सरकारने सुचविले आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी चावडी वाचनाच्या ऐवजी शाळा व्यवस्थापन समिती समोर विद्यार्थी व शिक्षकांचे कथा, काव्य वाचन घेण्यात यावे, तसेच यावेळी प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू, फळे यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याच्या सूचना सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. (प्रतिनिधी)