शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

 मालमत्ता खरेदी-विक्रीचे आॅनलाईन नोंदणी व्यवहार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 11:38 IST

कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असलेली जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये उद्यापासून (दि.६)उघडणार आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत होणार आहेत.

अहमदनगर : कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असलेली जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये ६ मे पासून उघडणार आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत होणार आहेत.मुद्रांक शुल्क विषयक नोंदणी आॅनलाईन प्रणालीद्वारे पूर्ववत सुरु करण्याबाबतचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय हे कलम १४४ चे पालन करुन ६ मे पासून सुरू होत आहेत, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली.शासनाने याबाबत काही अटी-शर्ती घालून दिलेल्या आहेत. कंटेन्मेंट झोन घोषित केलेल्या क्षेत्राचा प्रतिबंधित कालावधी पूर्ण झाल्यानंतर तेथे दस्तांची नोंदणी सुरु करावी. कार्यालये सुरु करण्याच्या दिवशी व नंतर किमान प्रत्येक ७ दिवसांनी निर्जंतूक करुन घ्यावीत. नागरिकांना दस्त नोंदणीसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ईस्टेपद्वारे व इतर ठिकाणी ईस्टेप इन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य राहील. दस्त छाननी सादरीकरण झाल्यावरच इतर पक्षकारांना कबुली जबाब देण्यासाठी नावाच्या क्रमवारीनुसार प्रवेश द्यावा. एकावेळी जास्तीत जास्त चारच पक्षकारांना आत प्रवेश द्यावा. बायोमेट्रिक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व नंतर ते निर्जंतुक करावे. कर्मचाºयांनीही मास्क, ग्लोव्हज घालावे व सर्वांना सॅनिटायझर उपलब्ध करावे.बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाजाचे हॅन्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची आदींचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. कार्यालयात टेबलांमधील अंतर किमान २ मीटर ठेवावे. नागरिकांना तोंडावर मास्क, स्वच्छ रुमाल बांधण्याबाबत सक्ती करावी, तसेच रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये पुरेसे अंतर राहील यादृष्टिने खुणा कराव्यात. आवश्यकता असल्यास पोलिसांची मदत घ्यावी. दस्त नोंदणी कार्यालयात ३३ टक्के कर्मचाºयांनी उपस्थित रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बँक व बँकेतर वित्तीय संस्थांच्या वित्तपुरवठा कामकाजाकरिता मुद्रांक विकेत्यांकडून मुद्रांक पेपर फ्रँकिंग, बँकाकडून ईएसबीटीआर घेणे शक्य झालेले नाही. निष्पादीत करण्यात आलेल्या दस्तांचे मुद्रांक शुल्क विहित मुदतीमध्ये भरणे शक्य झाले नाही. अशा दस्तांचा भरणा ६ मे रोजी करता येईल, असेही मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTaxकरGovernmentसरकार