शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कांदा खरेदीचा शेतकऱ्यांना लाभ नाही; बाजारभाव २८०० वर, नाफेडची खरेदी मात्र २४०० रुपयाने

By शिवाजी पवार | Updated: September 7, 2023 16:10 IST

 कांदा खरेदीचा बाजार समित्यांमधील दरवाढीला लाभ होत नसून हा निव्वळ फार्स ठरला आहे. 

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून नाफेडमार्फत दोन लाख टन कांदा खरेदीची घोषणा केली. मात्र, बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर २८०० रुपयांवर पोहोचले असताना नाफेड केवळ २४१० रुपयाने खरेदी करू पाहत आहे. नाफेडच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या या कांदा खरेदीचा बाजार समित्यांमधील दरवाढीला लाभ होत नसून हा निव्वळ फार्स ठरला आहे. 

केंद्र सरकारने नुकतेच कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला. त्यामुळे गडबडून गेलेल्या राज्य सरकारने  नाफेडमार्फत तातडीने दोन लाख टन कांद्याची २४१० रुपये क्विंटल दराने खरेदीची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र त्याचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना होऊ शकलेला नाही. उलट नाफेडच्या या खरेदीमुळे कांद्याचे भाव स्थिर राहून शेतकऱ्यांच्या खिशात जास्तीचे पैसे मिळणार नाहीत, अशी तजवीज केल्याचा आरोप होत आहे.

मूल्य स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून  नाफेडकडून शेतमालाची खरेदी केली जाते. हरभरा, तूर, मूग आदी वस्तूंचे बाजारभाव कोसळल्यानंतर आधारभूत किंमतीवर हा माल नाफेडकडून उचलला जातो. मात्र, कांद्याला आधारभूत दर नसल्यामुळे  बाजारातील  दरावरूनच  नाफेडचा  खरेदी दर निश्चित होतो. त्यामुळे राज्य सरकारने २४१० रुपयांनी कांदा खरेदी जाहीर केली. प्रत्यक्षात राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर २५०० ते २८०० रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. त्यामुळे नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

नाफेड स्वत: कांदा खरेदी न करता फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा उचलून त्याचा साठा करते. कंपन्यांचे कांदा खरेदीचे निकष जाचक आहेत. केवळ उच्च प्रतीचा माल त्यांच्याकडून घेतला जातो. इतर माल मात्र ते नाकारतात.  दुसरीकडे कांद्याचे बाजारभाव भडकल्यानंतर हाच साठवणूक केलेला कांदा पुन्हा बाजारात आणून भाव पाडले जातात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.थेट खरेदी हवी

पूर्वी नाफेडकडून वर्षभर खरेदीची प्रक्रिया राबवली जात होती. लिलाव प्रक्रियेत त्यांचे अधिकारी सहभागी झाल्यामुळे बाजारभाव उंचावले जात होते. आता नाफेड फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांमार्फत खरेदी करत असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वढावणे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :onionकांदा