शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कांदा खरेदीचा शेतकऱ्यांना लाभ नाही; बाजारभाव २८०० वर, नाफेडची खरेदी मात्र २४०० रुपयाने

By शिवाजी पवार | Updated: September 7, 2023 16:10 IST

 कांदा खरेदीचा बाजार समित्यांमधील दरवाढीला लाभ होत नसून हा निव्वळ फार्स ठरला आहे. 

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून नाफेडमार्फत दोन लाख टन कांदा खरेदीची घोषणा केली. मात्र, बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर २८०० रुपयांवर पोहोचले असताना नाफेड केवळ २४१० रुपयाने खरेदी करू पाहत आहे. नाफेडच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या या कांदा खरेदीचा बाजार समित्यांमधील दरवाढीला लाभ होत नसून हा निव्वळ फार्स ठरला आहे. 

केंद्र सरकारने नुकतेच कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला. त्यामुळे गडबडून गेलेल्या राज्य सरकारने  नाफेडमार्फत तातडीने दोन लाख टन कांद्याची २४१० रुपये क्विंटल दराने खरेदीची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र त्याचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना होऊ शकलेला नाही. उलट नाफेडच्या या खरेदीमुळे कांद्याचे भाव स्थिर राहून शेतकऱ्यांच्या खिशात जास्तीचे पैसे मिळणार नाहीत, अशी तजवीज केल्याचा आरोप होत आहे.

मूल्य स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून  नाफेडकडून शेतमालाची खरेदी केली जाते. हरभरा, तूर, मूग आदी वस्तूंचे बाजारभाव कोसळल्यानंतर आधारभूत किंमतीवर हा माल नाफेडकडून उचलला जातो. मात्र, कांद्याला आधारभूत दर नसल्यामुळे  बाजारातील  दरावरूनच  नाफेडचा  खरेदी दर निश्चित होतो. त्यामुळे राज्य सरकारने २४१० रुपयांनी कांदा खरेदी जाहीर केली. प्रत्यक्षात राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर २५०० ते २८०० रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. त्यामुळे नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

नाफेड स्वत: कांदा खरेदी न करता फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा उचलून त्याचा साठा करते. कंपन्यांचे कांदा खरेदीचे निकष जाचक आहेत. केवळ उच्च प्रतीचा माल त्यांच्याकडून घेतला जातो. इतर माल मात्र ते नाकारतात.  दुसरीकडे कांद्याचे बाजारभाव भडकल्यानंतर हाच साठवणूक केलेला कांदा पुन्हा बाजारात आणून भाव पाडले जातात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.थेट खरेदी हवी

पूर्वी नाफेडकडून वर्षभर खरेदीची प्रक्रिया राबवली जात होती. लिलाव प्रक्रियेत त्यांचे अधिकारी सहभागी झाल्यामुळे बाजारभाव उंचावले जात होते. आता नाफेड फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांमार्फत खरेदी करत असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वढावणे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :onionकांदा