शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

दोन दिवसांत कांदा खरेदी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2016 23:24 IST

जवळे : केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदेरिया यांनी नगरमध्ये दोन दिवसांत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा येथे केली़

जवळे : गेल्या दोन वर्षांत शेतकरी हिताचे सर्वाधिक निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा दावा करत केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदेरिया यांनी नगरमध्ये दोन दिवसांत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा येथे केली़ त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़केंद्रीय कृषी राज्यमंत्री व उद्योगमंत्री कलराज मिश्र शुक्रवारी नगर जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आले असता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ खासदार तथा भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय, खा़ दिलीप गांधी, नगरसेवक सुरेंद्र गांधी यावेळी उपस्थित होते़ कांद्याच्या अतिरिक्त उत्पादनाकडे कुंदेरिया यांनी लक्ष वेधले़ ते म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले, त्यामुळे भाव घसरले आहेत.परिणामी शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना धीर देण्याचे काम सरकार करत आहे़ शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने गेल्या दोन वर्षांत घेतले आहेत़ केंद्र सरकारने कांद्याची खरेदी सुरू केली आहे़ नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे़ ते नगर जिल्ह्यातही सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पारनेर तालुक्यातील जवळा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात केली़ त्यांच्या मागणीची दखल घेऊन दोन दिवसांत नगरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू होईल, असे आश्वासन कुंदेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिले़ पुणेमार्गे कुंदेरिया व मिश्र यांचे पारनेर तालुक्यातील जवळे गावात आगमन झाले़ गावातील दुष्काळाची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला़ त्याचबरोबर जवळा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यास त्यांनी हजेरी लावली़ भाजपाच्या सरकाने दोन वर्षांत केलेल्या कामांची माहिती दोन्ही मंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली़ तेथून नगर तालुक्यातील चास गावातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची त्यांनी पाहणी केली़ दुपारी तीन वाजता ते नगर शहरात दाखल झाले़ दुपारनंतर त्यांनी राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी, राहुरी येथील स्मशानभूमिचे लोकार्पण, वांबोरीसह गावांना भेटी दिल्या़ शनिवारी ते शेवगाव तालुक्यातील दुष्काळी गावांना भेटी देऊन आदर्श सांसद गावात आयोजित मेळाव्यास उपस्थित असणार आहेत़ (वार्ताहर)राज्यभर कांद्याची राज्य सरकारकडून खरेदी करण्यात येणार आहे़ कांदा खरेदीमुळे राज्याला होणारा तोटा केंद्र सरकारकडून दिला जाणार असल्याचे कुंदेरिया यांनी यावेळी सांगितले़