शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

आवक वाढल्याने कांदा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST

अहमदनगर : गावरान कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्याने कांद्याचे दर घसरत असून गुरुवारी नगर बाजार समितीत झालेल्या लिलावात कांदा ...

अहमदनगर : गावरान कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्याने कांद्याचे दर घसरत असून गुरुवारी नगर बाजार समितीत झालेल्या लिलावात कांदा दीड हजारांपर्यंत खाली आला. हे गेल्या वर्षभरातील निचांकी दर आहेत.

मागील वर्षी समाधानकारक पडलेल्या पावसामुळे पाण्याची स्थिती चांगली असल्याने उन्हाळी कांद्याचे उत्पादन वाढले आहे. गेल्या महिनाभरापर्यंत कांद्याला ३ हजारांपर्यंत भाव होता, परंतु १ मार्चपासून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येत असल्याने प्रत्येक लिलावात भाव घसरत आहेत. तीन हजारांहून कांदा अडीच, दोन व आता थेट दीड हजारांपर्यंत खाली आला आहे. गेल्या वर्षभरात कांद्याचे भाव टिकून होते. दिवाळीच्या दरम्यान तर कांद्याच्या भावाने दहा हजार रुपयांपर्यंत मजल मारली होती. हाच भाव टिकून राहील या अंदाजाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली. याच वेळी इतर राज्यांतही पाण्याची उपलब्धता असल्याने तिकडेही कांद्याचे उत्पादन घेतले गेले. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी काही प्रमाणात घडली. मागणी घटल्याचा व आवक वाढल्याचा परिणाम भाव कमी होण्यात झाला आहे.

नगर बाजार समितीत गुरुवारी (दि. १८) ७३ हजार ३३३ कांदा गोण्यांची (४० हजार ३३३ क्विंटल) आवक झाली. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला १३०० ते १५०० रुपयांचा भाव मिळाला.

-------------

गुरुवारच्या लिलावातील कांदा दर

प्रथम प्रतवारी - १३०० ते १५००

द्वितीय प्रतवारी - १००० ते १३००

तृतीय प्रतवारी - ७०० ते १०००

चतुर्थ प्रतवारी - ४०० ते ७००