शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मतदानासाठी एक हजार वाहनांची आवश्यकता

By admin | Updated: October 7, 2014 23:51 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बारा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाहनांची आवश्यकता असून, प्रशासकीय यंत्रणेने वाहनांची शोधाशोध सुरू केली आहे़

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बारा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाहनांची आवश्यकता असून, प्रशासकीय यंत्रणेने वाहनांची शोधाशोध सुरू केली आहे़ अवघ्या आठ दिवसांत ही वाहने उपलब्ध करावी लागणार असल्याने वाहने देता का वाहने, असे म्हणण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे़ विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे़ प्रचारासाठी अवघे आठ दिवस राहिले आहेत़ बारा मतदारसंघात येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येत आहे़ मतदानाची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे़ मतदानयंत्रापासून ते कर्मचारी नियुक्त करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना मतदान केंद्रांवर पोहोच करण्याची व्यवस्था करणे, अधिकाऱ्यांना स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करणे, मतदानासाठी लागणारे साहित्य पुरविणे,यासारखे नियोजन करण्यात आले आहे़ मतदानाच्या दिवशी किती वाहने लागतील, याचा आराखडा तयार झाला आहे़ त्यानुसार वाहने अधिग्रहण करण्यात येत असून, जिल्ह्यातील बारा मतदारसंघात ३ हजार ५९७ मतदान केंद्र आहेत़मतदारसंघातील अधिकाऱ्यांकडूनच वाहनांबाबतचा आहवाल मागविला होता़ तो प्राप्त झाला आहे़ त्यानुसार बारा मतदारसंघात १ हजार ३१४ वाहनांची आवश्यकता आहे़ ही वाहने निवडणूक निरीक्षकांनी अधिग्रहण करायची आहेत, तशा सूचना संबंधित निवडणूक निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत़ मतदान केंद्रानिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची आवश्यकता असून, जिल्ह्यात कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी ४०५ बस लागतील़ अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी जीपची व्यवस्था करण्यात येणार आहे़ त्यासाठी ७९४ जीपचा शोध प्रशासनाकडून सुरू झाला आहे़ मतदानासाठीची यंत्र पोहोचविण्यासाठी ट्रक भाडेतत्वावर घेण्यात येतील़ ट्रकचा शोध कर्मचाऱ्यांनी सुरू केला असून,वाहनांसाठीची धावपळ सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी)