शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

हरिश्चंद्रगड अभयारण्यात शंभर फुटांचा वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 16:31 IST

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही. 

मच्छिंद्र देशमुख। कोतूळ : अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई हे सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिध्द आहे.  महाराष्ट्राचा प्राणी म्हणजे  ‘शेकरू’ सुद्धा अकोले तालुक्यातच आहे. राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही. अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखर हे राज्यातील सर्वात उंच शिखर गणले गेले आहे. तालुक्यातील दुसरी विशेष नोंद म्हणजे हरिश्चंद्रगड अभयारण्यातील  राज्यातील सर्वात उंच पानझडी वृक्ष लोद नावाचा वृक्ष. त्याची उंची ३०. ५० मीटर म्हणजे १०० फुटांपेक्षा जास्त आहे. गोलाई ९.१३ मीटर आहे. सरासरी विस्तार ११.५० मीटर असल्याची नोंद २००५ मध्ये एका लोखंडी फलकावर आहे. मात्र हे झाड तीन पिढ्यांपासून या जंगलातील सर्वात उंच झाड असल्याचे स्थानिक आदिवासी  सांगतात. इंग्रज सरकारने देखील याला महावृक्ष हे नाव दिले आहे. हा वृक्ष ज्या भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. भैरवनाथाची देवराई असल्याने किमान एक हजार वर्ष इथे कुºहाड चालली नाही. या देवराईत आजही लोद, आंबा, करप, सादडा, उंबर, माड, हिरड असे पन्नास ते ऐंशी फूट उंचीचे शेकडो वृक्ष आहेत. या ठिकाणी किमान पन्नास शेकरांची घरटी उंच झाडावर आहेत. वानरे, माकडे, सापांचीही रेलचेल आहे.   वृक्षाजवळ १५ वर्षांपूर्वी उंची व आकाराबाबत वन विभागाने फलक लावलेला आहे. लोद या वृक्षाचे शास्रीय नाव फायकस नवरेसा असे आहे.

लोद या वृक्षाबाबत अलिकडेच माहिती मिळाली आहे. उंचीबाबत तुलनात्मक दृष्टीने अनेक संपर्क व शोध घेतले.  इतक्या उंचीचा वृक्ष आढळत नाही.  विशेष संशोधन व भैरवगड परिसर शेकरांमुळे  सायलेंट झोन असल्याने जबाबदारी वाढली आहे, असे हरिश्चंद्र गडाचे वनपरिक्षेत्राधिकारी अमोल आडे यांनी सांगितले. 

    लोदाची झाडे कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात आहेत. तो वड व उंबर यांच्या वंशातला आहे. हा वृक्ष म्हणजे आपल्या अभयारण्याची शान आहे, असे  हरिश्चंद्र गडाचे वनपरिक्षेत्राधिकारी डी. डी. पडवळ यांनी सांगितले.     

सातवाहन ट्रेकर्सने राज्यातील दीडशे किल्ले, गडवाटा व जंगले पाहिली आहेत. मात्र इतक्या उंचीचा व वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आढळला नाही. रेकॉर्ड आॅफ बुकमध्ये नोंद केल्यास पर्यटनाला नवा इतिहास मिळेल, असे सातवहन ट्रेकर्स ग्रुपचे अध्यक्ष धनंजय गाडेकर यांनी सांगितले.      

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेenvironmentपर्यावरण