शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

हरिश्चंद्रगड अभयारण्यात शंभर फुटांचा वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 16:31 IST

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही. 

मच्छिंद्र देशमुख। कोतूळ : अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई हे सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिध्द आहे.  महाराष्ट्राचा प्राणी म्हणजे  ‘शेकरू’ सुद्धा अकोले तालुक्यातच आहे. राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही. अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखर हे राज्यातील सर्वात उंच शिखर गणले गेले आहे. तालुक्यातील दुसरी विशेष नोंद म्हणजे हरिश्चंद्रगड अभयारण्यातील  राज्यातील सर्वात उंच पानझडी वृक्ष लोद नावाचा वृक्ष. त्याची उंची ३०. ५० मीटर म्हणजे १०० फुटांपेक्षा जास्त आहे. गोलाई ९.१३ मीटर आहे. सरासरी विस्तार ११.५० मीटर असल्याची नोंद २००५ मध्ये एका लोखंडी फलकावर आहे. मात्र हे झाड तीन पिढ्यांपासून या जंगलातील सर्वात उंच झाड असल्याचे स्थानिक आदिवासी  सांगतात. इंग्रज सरकारने देखील याला महावृक्ष हे नाव दिले आहे. हा वृक्ष ज्या भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. भैरवनाथाची देवराई असल्याने किमान एक हजार वर्ष इथे कुºहाड चालली नाही. या देवराईत आजही लोद, आंबा, करप, सादडा, उंबर, माड, हिरड असे पन्नास ते ऐंशी फूट उंचीचे शेकडो वृक्ष आहेत. या ठिकाणी किमान पन्नास शेकरांची घरटी उंच झाडावर आहेत. वानरे, माकडे, सापांचीही रेलचेल आहे.   वृक्षाजवळ १५ वर्षांपूर्वी उंची व आकाराबाबत वन विभागाने फलक लावलेला आहे. लोद या वृक्षाचे शास्रीय नाव फायकस नवरेसा असे आहे.

लोद या वृक्षाबाबत अलिकडेच माहिती मिळाली आहे. उंचीबाबत तुलनात्मक दृष्टीने अनेक संपर्क व शोध घेतले.  इतक्या उंचीचा वृक्ष आढळत नाही.  विशेष संशोधन व भैरवगड परिसर शेकरांमुळे  सायलेंट झोन असल्याने जबाबदारी वाढली आहे, असे हरिश्चंद्र गडाचे वनपरिक्षेत्राधिकारी अमोल आडे यांनी सांगितले. 

    लोदाची झाडे कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात आहेत. तो वड व उंबर यांच्या वंशातला आहे. हा वृक्ष म्हणजे आपल्या अभयारण्याची शान आहे, असे  हरिश्चंद्र गडाचे वनपरिक्षेत्राधिकारी डी. डी. पडवळ यांनी सांगितले.     

सातवाहन ट्रेकर्सने राज्यातील दीडशे किल्ले, गडवाटा व जंगले पाहिली आहेत. मात्र इतक्या उंचीचा व वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आढळला नाही. रेकॉर्ड आॅफ बुकमध्ये नोंद केल्यास पर्यटनाला नवा इतिहास मिळेल, असे सातवहन ट्रेकर्स ग्रुपचे अध्यक्ष धनंजय गाडेकर यांनी सांगितले.      

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेenvironmentपर्यावरण