शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST

संगमनेर : ‘गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे बस’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात ...

संगमनेर : ‘गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे बस’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात सेवेला सुरुवात केली. मात्र, सर्वसामान्यांसाठी धावणारी महामंडळाची लालपरी ग्रामीण मार्गावरून दूर होताना दिसते आहे. लालपरीच्या ग्रामीण भागातील फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नसलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे.

प्रवासाची अनेक साधने असूनही महामंडळाच्या लालपरीला आजही पूर्वीसारखेच महत्त्व आहे. ग्रामस्थांना, ग्रामीण भागातून शहरातील शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना लालपरी हक्काची वाटते. अकोले, संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागाबरोबरच सिन्नर (जिल्हा- नाशिक), आळेफाटा (जिल्हा- पुणे) येथूनही संगमनेर शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या-येणाऱ्या बसला नेहमीच गर्दी असायची. मात्र, कोरोना संसर्गामुळे साधारण दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील फेऱ्या बंद आहेत. लांब आणि मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात फेऱ्या बंद असून मुक्कामी जाणाऱ्या बसेस सध्या जात नाहीत.

एखाद्या गावात मुक्कामी गेलेली बस सकाळीच त्या गावातून निघायची. त्या बसने विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी शहरात यायचे. ग्रामस्थांना देखील तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी हे सोईचे असायचे. काम आटोपून पुन्हा गावाकडे जाणाऱ्या बसने विद्यार्थी, ग्रामस्थ गावी जायचे. शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने प्रवासी मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

संगमनेर आगारातून कोळवाडे, सावरगाव घुले, टाहकारी, डिग्रस, आश्वी, हिवरगाव आंबरे, पारेगाव, देवकौठे, साकूर यासह काही गावांमध्ये बसेस मुक्कामी जायच्या. कोरोना संसर्गामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी काही कामानिमित्त येण्यासाठी ग्रामस्थांना खासगी प्रवासी वाहनाने अथवा दुचाकीहून यावे लागते आहे. इंधनाचे दर वाढल्याने जाण्या-येण्यासाठी अधिक पैसे खर्च होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

-------------

त्यानंतर फेऱ्या नेहमीप्रमाणे सुरू होतील

संगमनेर आगारात एकूण ५३ बसेस आहेत. त्यापैकी दोन शिवशाही तर दोन सेमी लक्झरी बसेस आहेत. संगमनेर आगाराच्या ग्रामीण भागातील आणि शालेय फेऱ्या सध्या बंद आहेत. शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये नियमित सुरू झाल्यानंतर या फेऱ्या नेहमीप्रमाणे सुरू होतील, असे आगारप्रमुख नीलेश करंजकर यांनी सांगितले.

-----------

कोरोना संसर्गामुळे ग्रामीण भागात बसेसच्या फेऱ्या बंद केल्याची माहिती मिळाली. मुक्कामी येणारी बस आता येत नाही. त्यामुळे शहरात कामासाठी जाणाऱ्या कामगारांचे हाल होतात. किरकोळ शेतमाल घेऊन शेतकरी तो विकण्यासाठी पूर्वी बसने शहरात जायचे. मात्र, बसची फेरी बंद असल्याने खासगी वाहनाने प्रवास करणे परवडत नाही.

- दिनकर भाऊ घुले, सावरगाव घुले, ता. संगमनेर

-----------

संगमनेर आगाराचे प्रमुख नीलेश करंजकर यांना ग्रामीण भागात बसेस व मुक्कामी बसेस सुरू करण्यासाठी साधारण महिन्याभरापूर्वी अर्ज दिला आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या बंद असल्याने ग्रामस्थांचे, छोट्या व्यापाऱ्यांचे खूप हाल होत आहेत. ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या लवकरच सुरू कराव्यात, अशी अनेकांची मागणी आहे.

-वैभव भंडारी, आश्वी, ता. संगमनेर