शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

देवा सरं ना ह्यो भोग कशा पायी...हरवली वाट, दिशा अंधारल्या दाही लोणी परिसरातील बारा बलुतेदार अडचणीत: कोरोनाने जगणेच झाले ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:04 IST

लोणी : कोरोनामुळे जगणेच स्थिर झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचा प्रश्न अवघड बनला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेला शेतकरी आणखीनच घायाळ झाला आहे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दूध व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनाने मृत्यू पावणाºया रुग्णांइतकेच दु:ख संगतीला घेऊन कसाबसा तग धरून आहे. असे विदारक चित्र राहाता तालुक्यातील दुष्काळी टापूत दिसते आहे. हे चित्र काळजाला वेदना देणारे आहे.

गणेश आहेरलोकमत न्यूज नेटवर्कलोणी : कोरोनामुळे जगणेच स्थिर झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचा प्रश्न अवघड बनला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेला शेतकरी आणखीनच घायाळ झाला आहे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दूध व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनाने मृत्यू पावणाºया रुग्णांइतकेच दु:ख संगतीला घेऊन कसाबसा तग धरून आहे. असे विदारक चित्र राहाता तालुक्यातील दुष्काळी टापूत दिसते आहे. हे चित्र काळजाला वेदना देणारे आहे.कोरोनाने उद्योगधंद्यासोबतच ग्रामीण भागातील अर्थकारणही कोलमडले आहे, हातावर पोट भरणाºया मजुरांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन असल्याने उद्योगधंद्यांची चाके बंद पडली आहेत. या उद्योगांवर अवलंबून असणाºया मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. राहाता तालुक्यातही अनेक संस्थांनी १० ते ३० टक्के पगार दिले आहेत. तेथे काम करणारे मजूर घरीच बसून आहेत. तालुक्यातील सधन भागापेक्षा आडगांव, गोगलगाव, खडके,डोºहाळे, कोºहाळे, पिंपरी निर्मळ, केलवड आदी दुष्काळी भागातील परिस्थिती चिंताजनक आहे.राहाता तालुक्यात स्थानिक नागरिकांबरोबर परप्रातांतून आलेले २०ते २५ हजार लोक हे विविध व्यवसायाच्या माध्यमातून पोट भरत होते. त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने खायचे काय?असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. भंगार विक्रीतून पोट भरणारे बेचैन आहेत. बारा बलुतेदारांचे जगणे विस्कळीत झाले आहे.चौकट.....शेतकरी घायाळकोरोनाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाशवंत शेतीमाल उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. टरबूज पीक ांसाठी शेतकºयांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र सध्या ते बाजारपेठेत नेणे कठीण झाले आहे. हा माल मातीमोल भावात त्यांना विकावा लागत आहे. गोड मका, झेंडूची फुले, भाजीपाला जागेवरच कोमजला आहे. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे.--------------------जोडधंदा ही कोरोनाच्या कचाट्यातशेतीबरोबर इतर जोडधंदा असावा म्हणून काही शेतकरी कुक्कुटपालन, दुग्धपालन करतात. मात्र कोरोनामुळे या जोडधंद्यांचेही कंबरडे मोडले आहे. दूध विक्री मंदावली आहे. दुधाचा दर पाच रुपयांनी कमी झाला आहे. शेतकºयांना जनावरे पोसणे कठीण जात आहे. अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसाय आधीपासूनच अडचणीत आहे. यामुळे लाखो रुपयांचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.----------------कोरोनामुळे नैसर्गिक संकट ओढवले आहे. शेतकºयांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. लाखो रुपयांचे कर्ज काढून बांधलेले पोल्ट्री फार्मचे कर्ज कसे फेडणार जनावरांना कसे पोसायचे? कष्टाने पीक पिकवूनही ते विक्री न करता फेकू न द्यावे लागते.- विनायक चौधरी, पोल्ट्री व्यावसायिक, गोगलगाव, ता. राहाता--------------------गेल्या आठवड्यात ऐरणीवर हातोड्याचा घाव बसला नाही. त्यामुळे खोपट्यात चूल पेटली नाही. मुलांना पाण्यात पीठ घालून जगवतो आहे. सरकारचा एक छदामही मिळालेला नाही. रेशन दुकानात जाण्यासाठी कार्ड नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी कोणीच वाली नाही.-बाजीराव साळुंके, लोहार व्यावसायिक---दुष्काळ कायम पाचवीला पुजलेला,त्यातच आता कोरोना मुळे जीव घायाळतीला आला आहे. उन्हाळ्यात पाण्याची चिंता करायची की जीवाची असा प्रश्न आहे. खरिपात जे पेरले ते अतिवृष्टीने वाहून गेले. रब्बीला अवकाळीने झोडपून काढले. आता काय करणार?शिवाजी रामराव शेळके,शेतकरी,आडगांव ता.राहाता,---------------फोटो- १३ लोणी लोहारकोरोना संचारबंदीमुळे लोहार कामही थंडावले आहे. आठवड्यापासून ऐरणीवर घाव घातला नाही. त्यामुळे लोणी येथील बाजीराव सोळुंके यांच्यासमोर जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.