शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

देवा सरं ना ह्यो भोग कशा पायी...हरवली वाट, दिशा अंधारल्या दाही लोणी परिसरातील बारा बलुतेदार अडचणीत: कोरोनाने जगणेच झाले ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:04 IST

लोणी : कोरोनामुळे जगणेच स्थिर झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचा प्रश्न अवघड बनला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेला शेतकरी आणखीनच घायाळ झाला आहे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दूध व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनाने मृत्यू पावणाºया रुग्णांइतकेच दु:ख संगतीला घेऊन कसाबसा तग धरून आहे. असे विदारक चित्र राहाता तालुक्यातील दुष्काळी टापूत दिसते आहे. हे चित्र काळजाला वेदना देणारे आहे.

गणेश आहेरलोकमत न्यूज नेटवर्कलोणी : कोरोनामुळे जगणेच स्थिर झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचा प्रश्न अवघड बनला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेला शेतकरी आणखीनच घायाळ झाला आहे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दूध व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनाने मृत्यू पावणाºया रुग्णांइतकेच दु:ख संगतीला घेऊन कसाबसा तग धरून आहे. असे विदारक चित्र राहाता तालुक्यातील दुष्काळी टापूत दिसते आहे. हे चित्र काळजाला वेदना देणारे आहे.कोरोनाने उद्योगधंद्यासोबतच ग्रामीण भागातील अर्थकारणही कोलमडले आहे, हातावर पोट भरणाºया मजुरांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन असल्याने उद्योगधंद्यांची चाके बंद पडली आहेत. या उद्योगांवर अवलंबून असणाºया मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. राहाता तालुक्यातही अनेक संस्थांनी १० ते ३० टक्के पगार दिले आहेत. तेथे काम करणारे मजूर घरीच बसून आहेत. तालुक्यातील सधन भागापेक्षा आडगांव, गोगलगाव, खडके,डोºहाळे, कोºहाळे, पिंपरी निर्मळ, केलवड आदी दुष्काळी भागातील परिस्थिती चिंताजनक आहे.राहाता तालुक्यात स्थानिक नागरिकांबरोबर परप्रातांतून आलेले २०ते २५ हजार लोक हे विविध व्यवसायाच्या माध्यमातून पोट भरत होते. त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने खायचे काय?असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. भंगार विक्रीतून पोट भरणारे बेचैन आहेत. बारा बलुतेदारांचे जगणे विस्कळीत झाले आहे.चौकट.....शेतकरी घायाळकोरोनाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाशवंत शेतीमाल उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. टरबूज पीक ांसाठी शेतकºयांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र सध्या ते बाजारपेठेत नेणे कठीण झाले आहे. हा माल मातीमोल भावात त्यांना विकावा लागत आहे. गोड मका, झेंडूची फुले, भाजीपाला जागेवरच कोमजला आहे. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे.--------------------जोडधंदा ही कोरोनाच्या कचाट्यातशेतीबरोबर इतर जोडधंदा असावा म्हणून काही शेतकरी कुक्कुटपालन, दुग्धपालन करतात. मात्र कोरोनामुळे या जोडधंद्यांचेही कंबरडे मोडले आहे. दूध विक्री मंदावली आहे. दुधाचा दर पाच रुपयांनी कमी झाला आहे. शेतकºयांना जनावरे पोसणे कठीण जात आहे. अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसाय आधीपासूनच अडचणीत आहे. यामुळे लाखो रुपयांचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.----------------कोरोनामुळे नैसर्गिक संकट ओढवले आहे. शेतकºयांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. लाखो रुपयांचे कर्ज काढून बांधलेले पोल्ट्री फार्मचे कर्ज कसे फेडणार जनावरांना कसे पोसायचे? कष्टाने पीक पिकवूनही ते विक्री न करता फेकू न द्यावे लागते.- विनायक चौधरी, पोल्ट्री व्यावसायिक, गोगलगाव, ता. राहाता--------------------गेल्या आठवड्यात ऐरणीवर हातोड्याचा घाव बसला नाही. त्यामुळे खोपट्यात चूल पेटली नाही. मुलांना पाण्यात पीठ घालून जगवतो आहे. सरकारचा एक छदामही मिळालेला नाही. रेशन दुकानात जाण्यासाठी कार्ड नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी कोणीच वाली नाही.-बाजीराव साळुंके, लोहार व्यावसायिक---दुष्काळ कायम पाचवीला पुजलेला,त्यातच आता कोरोना मुळे जीव घायाळतीला आला आहे. उन्हाळ्यात पाण्याची चिंता करायची की जीवाची असा प्रश्न आहे. खरिपात जे पेरले ते अतिवृष्टीने वाहून गेले. रब्बीला अवकाळीने झोडपून काढले. आता काय करणार?शिवाजी रामराव शेळके,शेतकरी,आडगांव ता.राहाता,---------------फोटो- १३ लोणी लोहारकोरोना संचारबंदीमुळे लोहार कामही थंडावले आहे. आठवड्यापासून ऐरणीवर घाव घातला नाही. त्यामुळे लोणी येथील बाजीराव सोळुंके यांच्यासमोर जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.