शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विखेंच्या आदेशाला अधिका-यांकडून केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:43 IST

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्याच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिलेल्या आदेशाला विभागप्रमुखांनी केराची टोपली दाखविल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी नेमकं कुणाचे काम करतात, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्याच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिलेल्या आदेशाला विभागप्रमुखांनी केराची टोपली दाखविल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी नेमकं कुणाचे काम करतात, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विखे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला. संबंधित मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले़ मंत्र्यांना निवेदन देऊन कामे मार्गी लागत नाहीत. त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो़ त्यामुळे अध्यक्षा विखे यांनी जिल्हा परिषदेतील संबंधित विभागाच्या अधिका-यांना मंत्रालयात पाठपुरावा करण्याचा आदेश दिला होता. मात्र एकाही खातेप्रमुखाने मंत्रालयात जाऊन कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला नसल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आले आहे. त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना यासंदर्भात कळविले असून, संबंधित खाते प्रमुखांकडून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागविला आहे.जिल्हा परिषदेचे जमीन महसुलाचे २१ कोटींचे अनुदान शासनाकडे थकीत आहे़ सन २०१५,१६ आणि १७, या तीन वर्षांत मुद्रांक शुल्काचे ५ कोटी १३ लाखांच्या कपात केलेल्या निधीची ग्रामपंचायतनिहाय माहिती जिल्हा परिषदेकडे नाही, हे सर्व विषय ग्रामपंचायत विभागाशी संबंधित आहेत. बीओटी प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी देण्याचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. शाळांतील वीज बिलाची आकारणी कृषी दराने करण्याची जिल्हा परिषदेची मागणी आहे़ मात्र त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही़ दुधाळ जनावरे खरेदीसाठी ४० हजार मिळतात़ त्यात वाढ करून ६० हजार रुपये करावे, अशी जिल्हा परिषदेची मागणी आहे. पशूवैद्यकीय ११ दवाखाने शासन समायोजित करावेत. पशूसंवर्धन विभागाने प्रयोगशाळा बांधल्या आहेत़ परंतु, प्रशिक्षित कर्मचा-यांअभावी कामकाज बंद आहे. ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या आधारे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याची जिल्हा परिषदेची मागणी आहे. वृध्द कलावंतांच्या निवडीच्या संख्येत वाढ करावी, यासह जिल्हा परिषदेचे इतर प्रश्न प्रलंबित आहेत.

प्रशासन व्हिडीओ कॉन्फरन्स, बैठकांत व्यस्त

मंत्रालयातून विविध विभागाचे मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे अधिका-यांशी चर्चा करतात. दररोज कोणत्या ना कोणत्या विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्स असते. कधी कधी तर अचानक निरोप धडकतात. त्यामुळे अधिका-यांचा सर्वाधिक वेळ कॉन्फरन्स व बैठकांमध्ये जातो.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShalini Vikhe Patilशालिनी विखे पाटील