शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

ध्यान धारणेचा वस्तुपाठ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 11:56 IST

महाराष्ट्र  ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे योगदान अतुलनीय आहे. या महाराष्ट्रात संतांच्या अनेक परंपरा निर्माण झाल्या. अनेक संप्रदाय उदयास आले. या संप्रदायाच्या प्रचारार्थ त्या संप्रदायातील अनुयायांनी आणि परंपरेतील संतांनी संप्रदाय तत्त्व लोकमानसात रूजविण्यासाठी काही वाङ्मयनिर्मिती केली.

महाराष्ट्र  ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे योगदान अतुलनीय आहे. या महाराष्ट्रात संतांच्या अनेक परंपरा निर्माण झाल्या. अनेक संप्रदाय उदयास आले. या संप्रदायाच्या प्रचारार्थ त्या संप्रदायातील अनुयायांनी आणि परंपरेतील संतांनी संप्रदाय तत्त्व लोकमानसात रूजविण्यासाठी काही वाङ्मयनिर्मिती केली. याबरोबरच संप्रदायातील लोकांना आचारधर्म शिकविण्यासाठी काही मार्गही सांगितले गेले. त्या मार्गाने गेल्यास साधकास ईप्सित साध्य प्राप्त होते. हे कधी सायासाने तर कधी वर्तणुकीतून शिकविले. साधकास अंतिम साध्य प्राप्त करून घेण्यासाठी पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये व मन यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. ते केल्यासच साधकास अंतिम ध्येयाप्रद जाता येते. याविषयी अनेक साधनामार्गांनी आपापल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.नाना पंथ, नाना मार्ग या मतांच्या गलबल्यात सर्वसामान्य साधक भरकटला जातो. दशेंद्रिय व मन नियंत्रणासाठी काय करावे? योग आचरावा की, संन्यास? असे बरेचसे प्रश्न समाजासमोर उभे राहतात. मात्र संतांचे हेच काम असते की साधकास योग्य दिशा दाखविणे. हेच काम प.पू. सद्गुरू भागवताचार्य अशोकानंद महाराज यांनी केले आहे. आजपर्यंत गुरूवर्य अशोकानंदांची अनेकविध विषयावर ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. साध्या, सरळ, सोप्या व ओघवत्या भाषेत वाचकाशी संवादरूपाने अध्यात्माचे विवेचन बºयाच ग्रंथामधून केलेले दिसते.आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आपल्या मनावर बराच ताण घेऊन जगत आहे. मन:स्वास्थ्य हरवून बसला आहे. हे स्वास्थ्य मिळविण्यासाठी तो नाना खटपटी करतो पण हे उपाय पुरेसे पडत नाहीत. यासाठीच प.पू. गुरुवर्यांनी ‘मन:शांतीसाठी सुलभ ध्यान धरणा’ या छोटेखानी ग्रंथाचे लेखन केले आहे. या ग्रंथात वाचकांशी संवाद आहे. अष्टांग योगाचा सोेपेपणा त्यांनी या ग्रंथात करून सांगितला आहे. सर्वसामान्यांच्या मनात योगाविषयी काही साशंकता आहे. अष्टांग योगातील यम,  नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या प्रमुख टप्प्यांचा सुलभ अर्थ लेखकाने यात सांगितला आहे.यम म्हणजे नैतिकता होय. यात सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आदी गोष्टींचा अंतर्भाव सांगितला व तो साधक कसा असावा तर सत्यवादी असावा, असे सहजपणे सांगितले आहे. नियम म्हणजे शौच, संतोष तपादी गोष्टींचे सुंदर विवेचन या ग्रंथात केले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधनेसाठी आसन या गोष्टींवर विशेष भर दिला. आसन जय झाला की सर्व साध्य होते ते कसे असावे? याविषयीचे सुंदर चिंतन या ग्रंथात आहे. प्राणायाम, प्राण म्हणजे शक्ती व आयाम म्हणजे नियंत्रण होय. या बाबींचा उल्लेख छान पद्धतीने केला आहे.प्रत्याहार म्हणजेच इंदियांना इतर विषयाकडून खेचून आत्मविषयात कसे रमविले पाहिजे याचे चिंतन त्यांनी मांडले आहे. धारणा या प्रकाराविषयी चिंतन मांडताना एकाग्रता कशी करायची, चंचलता कशी कमी करायची? सहजासनात बसून धारणा बाह्यविषयापासून चित्त अंतर्मुख कसे करावे याचे विवेक चिंतन या ग्रंथात आहे.ध्यान ही अष्टांग योगातील महत्त्वाची पायरी होय. ध्यानाने देहतादात्म्य कसे सुटते, नादानुसंधान कसे लागते याचे विवेचन फार सुरेख पद्धतीने आले आहे. यातील शेवटची पायरी म्हणजे समाधी होय. यात सविल्प समाधी, निर्विकल्प समाधी याविषयीचे सूक्ष्म विवेचन लेखकाने केलेले आहे. वरील क्रम व्यवस्थित राखल्यास व आसनजप, श्वासनियंत्रण झाल्यास मनाची एकाग्रता झाल्यास समाधी सहज प्राप्त होऊ शकते याचे सुंदर विवेचन चिंतन या ग्रंथात आहे.या ग्रंथ केवळ योग्यांसाठीच नाही तर सर्वसामान्य व्यक्तींसाठी देखील आहे. मन:स्वास्थ्य हरवलेल्या व्यक्तीला व साधकाला दिशादर्शक ग्रंथ आहे. या ग्रंथात विविध विषयावर स्पष्टीकरण देतांना वेद, श्रीमद्भागवत, गीता, संतवाङ्मय आदीतील संदर्भ आहेत. साधकाने ध्यान धारणा कशी करावी याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे हा ग्रंथ होय. एकूणच हा ग्रंथ म्हणजे ‘गागर में सागर’ होय असे मला वाटते.-डॉ. भाऊसाहेब मुळे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक