शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या शंभरीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

अहमदनगर : जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही सरासरी १००च्या वर आहे. त्यामुळे अद्याप तरी एकही तालुका कोरोनामुक्त ...

अहमदनगर : जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही सरासरी १००च्या वर आहे. त्यामुळे अद्याप तरी एकही तालुका कोरोनामुक्त झाला नसल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक तालुक्यात रोज सरासरी ४५ ते ५० कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सर्वात कमी रुग्ण नगर शहरात आढळून येत आहेत. भिंगार शहरातील रुग्णांची संख्याही आता कमी होत असून, हा परिसर लवकरच कोरोनामुक्त होत असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनचे निर्बंध उठविण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने यंत्रणेनेही हात टेकले आहेत. त्यामुळे तालुके कोरोनामुक्त होण्यास आणखी किती अवधी लागणार, याकडेही लक्ष लागले आहे.

----

नागरिकांनी सभा, समारंभ, लग्नसोहळे सध्या शक्यतो टाळावेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मात्र अनलॉक झाल्यानंतर लोक गर्दी करीत आहेत. गर्दी होत असेल तर कारवाई करण्याच्या सूचना तालुका यंत्रणेला दिल्या आहेत. ग्रामीण भागात हिवरेबाजार पॅटर्नची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

-डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

---

तालुका सक्रिय रुग्ण

नगर शहर १२३

अकोले २८५

जामखेड २२९

कर्जत २३५

कोपरगाव २४४

नगर ग्रामीण ११४

नेवासा ३३१

पारनेर ३३६

पाथर्डी ३७१

राहाता १४२

राहुरी २४६

संगमनेर ३६८

शेवगाव २९१

श्रीगोंदा ३७९

श्रीरामपूर २२३

भिंगार १५

--------------

आतापर्यंत झालेल्या चाचण्या- १४,११,५०९

बाधित होण्याचे प्रमाण- ४.१० टक्के

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- ९६.८१ टक्के

-------------

एकूण रुग्ण- २,६४,७१३

उपचार सुरू असलेले - ३९६८

एकूण मृत्यू- ४७६१

---------

मृत्युदर - १.३० टक्के

कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर - ३ तालुके

---

अनलॉकनंतर वाढले रुग्ण

अनलॉकनंतर ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. राहुरी तालुक्यात सलग तीन दिवस ५०च्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. नगर शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी रोज सरासरी १५ रुग्ण आढळून येत आहेत.

---------