शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच एनआरसीचा फटका अधिक-बी. जी. कोळसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 13:23 IST

केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे मुस्लिमविरोधात नसून मुस्लिम फक्त बहाणा आहे. खरं तर देशातील ५० टक्के लोकांकडे जन्माचे दाखलेच नाहीत. परिणामी एनआरसीचा फटका मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच अधिक बसणार आहे.

अहमदनगर : केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे मुस्लिमविरोधात नसून मुस्लिम फक्त बहाणा आहे. खरं तर देशातील ५० टक्के लोकांकडे जन्माचे दाखलेच नाहीत. परिणामी एनआरसीचा फटका मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच अधिक बसणार आहे. त्यामुळे सर्वांनीच या कायद्याविरोधात रस्त्यावर येण्याची गरज असल्याचे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. गुरूवारी ‘लोकमत’ कार्यालयात आले असता त्यांनी एनआरसी, सीएएवर सविस्तर भाष्य केले. मोदी सरकार एनआरसीच्या माध्यमातून देशात अराजकता पसरवत आहे. ज्यांना संविधानाने या देशाचे नागरिकत्व बहाल केले आहे, त्यांना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करायला लावले जात आहे. वरकरणी एनआरसी, सीएए हे मुस्लिमविरोधात दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याचा फटका देशातील एससी, एसटी, ओबीसी यांनाच अधिक बसणार आहे. कारण एनआरसीसाठी जन्माचे पुरावे मागितले जात आहेत. प्रत्यक्षात १९८५ च्या आधी जन्मलेल्या  बहुतांश लोकांकडे असे पुरावेच नाहीत. देशात अशी निम्मी लोकसंख्या आहे. मूठभर देशविरोधी लोकांना बाहेर काढण्यासाठी हे सरकार पूर्ण देशाला वेठीस धरत  आहे.  हा प्रकार म्हणजे घरात  घुसलेला ढेकूण काढण्यासाठी घरच पेटवून देण्यासारखा आहे, असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.देशावर आधी ५० लाख  कोटींचे कर्ज होते. त्यात मोदी सरकारने ४० लाख कोटींची भर टाकली. हे कर्ज घेऊन उद्योगपतींना सवलतीची खैरात केली, तर दुसरीकडे गरिबांच्या हातातून पैसा काढून घेतला. त्यामुळे मंदीचे वातावरण तयार झाले आहे, असे कोळसे पाटील म्हणाले.निवडणुकीसाठी युध्दमोदी सरकार भावनिक मुद्दे करून निवडणुका जिंकते. पुलवामा, ३७० कलम आदी मुद्दे आता संपले आहेत. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीवेळी पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी युद्ध छेडले जाईल. त्यातून देशभर भावनिक वातावरण करून निवडणुका पदरात पाडल्या जातील. यात दोन्ही देशांचे नुकसान करण्याचा डाव मोदी सरकारचा आहे, असा आरोपही कोळसे पाटील यांनी केला. दिल्लीची दंगल गुजरात पॅटर्नसीएएविरोधात मुस्लिम महिलांनी दिल्लीत छेडलेले आंदोलन चिरडण्यासाठी दिल्लीत गुजरात पॅटर्न दंगल घडवण्यात आली. भाजपचे नेते वेळोवेळी हे आंदोलन मोडून काढण्याची भाषा करत होते, असा गंभीर आरोपही कोळसे यांनी केला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत