शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
3
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
4
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
5
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
6
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
7
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
8
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
9
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
10
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
11
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
12
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
13
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
14
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
15
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
16
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
17
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
18
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
19
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
20
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?

मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच एनआरसीचा फटका अधिक-बी. जी. कोळसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 13:23 IST

केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे मुस्लिमविरोधात नसून मुस्लिम फक्त बहाणा आहे. खरं तर देशातील ५० टक्के लोकांकडे जन्माचे दाखलेच नाहीत. परिणामी एनआरसीचा फटका मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच अधिक बसणार आहे.

अहमदनगर : केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे मुस्लिमविरोधात नसून मुस्लिम फक्त बहाणा आहे. खरं तर देशातील ५० टक्के लोकांकडे जन्माचे दाखलेच नाहीत. परिणामी एनआरसीचा फटका मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच अधिक बसणार आहे. त्यामुळे सर्वांनीच या कायद्याविरोधात रस्त्यावर येण्याची गरज असल्याचे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. गुरूवारी ‘लोकमत’ कार्यालयात आले असता त्यांनी एनआरसी, सीएएवर सविस्तर भाष्य केले. मोदी सरकार एनआरसीच्या माध्यमातून देशात अराजकता पसरवत आहे. ज्यांना संविधानाने या देशाचे नागरिकत्व बहाल केले आहे, त्यांना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करायला लावले जात आहे. वरकरणी एनआरसी, सीएए हे मुस्लिमविरोधात दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याचा फटका देशातील एससी, एसटी, ओबीसी यांनाच अधिक बसणार आहे. कारण एनआरसीसाठी जन्माचे पुरावे मागितले जात आहेत. प्रत्यक्षात १९८५ च्या आधी जन्मलेल्या  बहुतांश लोकांकडे असे पुरावेच नाहीत. देशात अशी निम्मी लोकसंख्या आहे. मूठभर देशविरोधी लोकांना बाहेर काढण्यासाठी हे सरकार पूर्ण देशाला वेठीस धरत  आहे.  हा प्रकार म्हणजे घरात  घुसलेला ढेकूण काढण्यासाठी घरच पेटवून देण्यासारखा आहे, असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.देशावर आधी ५० लाख  कोटींचे कर्ज होते. त्यात मोदी सरकारने ४० लाख कोटींची भर टाकली. हे कर्ज घेऊन उद्योगपतींना सवलतीची खैरात केली, तर दुसरीकडे गरिबांच्या हातातून पैसा काढून घेतला. त्यामुळे मंदीचे वातावरण तयार झाले आहे, असे कोळसे पाटील म्हणाले.निवडणुकीसाठी युध्दमोदी सरकार भावनिक मुद्दे करून निवडणुका जिंकते. पुलवामा, ३७० कलम आदी मुद्दे आता संपले आहेत. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीवेळी पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी युद्ध छेडले जाईल. त्यातून देशभर भावनिक वातावरण करून निवडणुका पदरात पाडल्या जातील. यात दोन्ही देशांचे नुकसान करण्याचा डाव मोदी सरकारचा आहे, असा आरोपही कोळसे पाटील यांनी केला. दिल्लीची दंगल गुजरात पॅटर्नसीएएविरोधात मुस्लिम महिलांनी दिल्लीत छेडलेले आंदोलन चिरडण्यासाठी दिल्लीत गुजरात पॅटर्न दंगल घडवण्यात आली. भाजपचे नेते वेळोवेळी हे आंदोलन मोडून काढण्याची भाषा करत होते, असा गंभीर आरोपही कोळसे यांनी केला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत